शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

संसदेतील गदारोळात १३३ कोटी रुपयांचा चुराडा,कामकाज चालू शकले अवघे १८ तास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 7:05 AM

Parliament Monsoon Session Update: संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पेगॅसस, नवे कृषी कायदे अशा काही मुद्यांवर गदारोळ माजवत विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले.

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले आहेत. पेगॅसस, नवे कृषी कायदे अशा काही मुद्यांवर गदारोळ माजवत विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरले. (Parliament Monsoon Session Update)त्यामुळे या अधिवेशन काळात ८९ तास वाया गेले असून फक्त १८ तासच कामकाज होऊ शकले असून वाया गेलेल्या तासांमुळे जनतेच्या १३३ कोटींचा चुराडा झाला. 

सूत्रांनी सांगितले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत १०७ तास काम होणे अपेक्षित होते; पण विरोधकांच्या गदारोळामुळे निर्धारित वेळेपैकी फक्त १७ टक्के कामकाज होऊ शकले. पावसाळी अधिवेशन १९ जुलैला सुरू झाले व १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. राज्यसभेत आजवर फक्त २१ टक्के,  तर लोकसभेत १३ टक्क्यांपेक्षाही कमी कामकाज झाले. गेल्या दोन आठवड्यांत लोकसभेमध्ये ५४ तासांऐवजी फक्त ७ तास व राज्यसभेमध्ये ५३ पैकी ११ तास काम झाले. संसदेमध्ये १०७ ऐवजी फक्त १८ तास काम झाले आहे.

पेगॅससप्रकरणी विरोधकांना संसदेत सविस्तर चर्चा हवी आहे. पेगॅससचा वापर करून मोदी सरकारने स्वत:चे मंत्री विरोधी पक्षांतील नेते, पत्रकार, उद्योजक अशा सुमारे ३०० जणांवर पाळत ठेवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र, हे आरोप केंद्राने फेटाळून लावले आहेत. नव्या कृषी कायद्यांबाबतही केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दडपण्याचा  प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.

फक्त ५ विधेयके मंजूरसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत लोकसभा व राज्यसभेत फक्त पाच विधेयके मंजूर झाली आहेत. तसेच अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी सांगितले.  

टॅग्स :ParliamentसंसदPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस