शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

विधानसभेत नितीशकुमारांना पाहून तेजस्वी यादव भडकले; आवाजी मतदानावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:38 PM

Bihar Assembly speaker: अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता विधानसभेचे अध्यक्ष निवडीवरून बिहारमधील वातावरण तापले आहे. बिहार विधानसभेच्या पाच दिवशीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत राजदच्या आमदारांनी गोंधळ घातला असून नितीश कुमार आणि त्यांच्या एका मंत्र्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे मंत्री अशोक चौधरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामुळे नितीशकुमार सभागृहात आले आहेत. त्यांना पाहताच राजदचे नेते तेजस्वी यादव भडकले. हंगामी अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नवीन अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आणि राजदच्या नेत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. 

तेजस्वी यांनी नितीशकुमार यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच आमदारांनी मांझी यांच्याकडे धाव घेत नियमावलीचे पुस्तक दाखवत आवाजी मतदानावर आक्षेप घेतला. यावर  मांझी यांनी विधानसभेबाहेरील जे आलेत ते मतदानात भाग घेणार नाहीत. यामुळे त्यांच्या उपस्थितीची कोणतीही समस्या नाही, असे सांगितले. 

यावर तेजस्वी यादव यांनी आक्षेप घेत आवाजी मतदानाने नाही तर नेहमीसारखे मतदान घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी मागणी केली आहे. येथे जनतेच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. आम्ही असे होऊ देणार नाही, असे सांगितले. यानंतर झालेला गोंधळ पाहता विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. 

दरम्यान, अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

 

राजदच्या आक्षेपावर कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, बिहारची ही परंपरा राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री हजर राहू शकतात. मात्र, ते सदस्य नसल्याने मतदान करू शकत नाहीत.

लालू प्रसादांचे भाजपा आमदारांना फोन

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असा आरोप केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याा  कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं देखील सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहार