शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

विधानसभेत नितीशकुमारांना पाहून तेजस्वी यादव भडकले; आवाजी मतदानावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 12:38 IST

Bihar Assembly speaker: अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता विधानसभेचे अध्यक्ष निवडीवरून बिहारमधील वातावरण तापले आहे. बिहार विधानसभेच्या पाच दिवशीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत राजदच्या आमदारांनी गोंधळ घातला असून नितीश कुमार आणि त्यांच्या एका मंत्र्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे मंत्री अशोक चौधरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामुळे नितीशकुमार सभागृहात आले आहेत. त्यांना पाहताच राजदचे नेते तेजस्वी यादव भडकले. हंगामी अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नवीन अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आणि राजदच्या नेत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. 

तेजस्वी यांनी नितीशकुमार यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच आमदारांनी मांझी यांच्याकडे धाव घेत नियमावलीचे पुस्तक दाखवत आवाजी मतदानावर आक्षेप घेतला. यावर  मांझी यांनी विधानसभेबाहेरील जे आलेत ते मतदानात भाग घेणार नाहीत. यामुळे त्यांच्या उपस्थितीची कोणतीही समस्या नाही, असे सांगितले. 

यावर तेजस्वी यादव यांनी आक्षेप घेत आवाजी मतदानाने नाही तर नेहमीसारखे मतदान घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी मागणी केली आहे. येथे जनतेच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. आम्ही असे होऊ देणार नाही, असे सांगितले. यानंतर झालेला गोंधळ पाहता विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. 

दरम्यान, अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

 

राजदच्या आक्षेपावर कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, बिहारची ही परंपरा राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री हजर राहू शकतात. मात्र, ते सदस्य नसल्याने मतदान करू शकत नाहीत.

लालू प्रसादांचे भाजपा आमदारांना फोन

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असा आरोप केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याा  कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं देखील सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहार