शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

विधानसभेत नितीशकुमारांना पाहून तेजस्वी यादव भडकले; आवाजी मतदानावर घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2020 12:38 IST

Bihar Assembly speaker: अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

पटना : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता विधानसभेचे अध्यक्ष निवडीवरून बिहारमधील वातावरण तापले आहे. बिहार विधानसभेच्या पाच दिवशीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत राजदच्या आमदारांनी गोंधळ घातला असून नितीश कुमार आणि त्यांच्या एका मंत्र्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे मंत्री अशोक चौधरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामुळे नितीशकुमार सभागृहात आले आहेत. त्यांना पाहताच राजदचे नेते तेजस्वी यादव भडकले. हंगामी अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नवीन अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आणि राजदच्या नेत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. 

तेजस्वी यांनी नितीशकुमार यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच आमदारांनी मांझी यांच्याकडे धाव घेत नियमावलीचे पुस्तक दाखवत आवाजी मतदानावर आक्षेप घेतला. यावर  मांझी यांनी विधानसभेबाहेरील जे आलेत ते मतदानात भाग घेणार नाहीत. यामुळे त्यांच्या उपस्थितीची कोणतीही समस्या नाही, असे सांगितले. 

यावर तेजस्वी यादव यांनी आक्षेप घेत आवाजी मतदानाने नाही तर नेहमीसारखे मतदान घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी मागणी केली आहे. येथे जनतेच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. आम्ही असे होऊ देणार नाही, असे सांगितले. यानंतर झालेला गोंधळ पाहता विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. 

दरम्यान, अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे. 

 

राजदच्या आक्षेपावर कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, बिहारची ही परंपरा राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री हजर राहू शकतात. मात्र, ते सदस्य नसल्याने मतदान करू शकत नाहीत.

लालू प्रसादांचे भाजपा आमदारांना फोन

सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असा आरोप केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याा  कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं देखील सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे.

टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBiharबिहार