शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सोशल मीडियावरचे माफिया आजही मला खुनी म्हणतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 19:26 IST

मी अनेक अग्निदिव्यांमधून गेलेलो आहे आणि काही अजूनही संपलेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी मी सोशल मीडियावर खरे अकाउंट असणाऱ्या व्यक्तीशी बोलायचो. पण आता तिथे ९५ टक्के लोक खोटे आणि ट्रोलर्स  आहेत. 

पुणे : मी अनेक अग्निदिव्यांमधून गेलेलो आहे आणि काही अजूनही संपलेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी मी सोशल मीडियावर खरे अकाउंट असणाऱ्या व्यक्तीशी बोलायचो. पण आता तिथे ९५ टक्के लोक खोटे आणि ट्रोलर्स  आहेत.  राजकारणात प्रवेश केल्यावर माझ्याभोवती असणारे सुरक्षेचे कवच अचानक नाहीसे झाले आणि मी काही लोकांचे लक्ष्य झालो. आजही सोशल मीडियावर ९५ टक्के लोक हे ट्रोलर्स आहेत. आजही सोशल मीडियावरून टीका करणारे माफिया मला खुनी म्हणतात असे विधान खासदार शशी थरूर यांनी केले. 

पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'व्हाय आय एम ए हिंदू ' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादावर मते मांडली. ते पुढे म्हणाले की, 'मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला  स्वतःच्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्टय आहे. अशी संधी कोणताही इतर धर्म देत नाही. उदाहरणार्थ मी रामाला मानतो तर दुसरी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करते तर आम्ही दोघेही हिंदू ठरतो. मात्र एखादी व्यक्ती ते करत नसेल तरीही ती हिंदूच ठरते. फक्त धार्मिक नव्हे तर एकमेकांचे राजकीय विचारही मान्य करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सध्याच्या भारतीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकारण हे राज्यकर्त्यांची आवड आणि कृती यात विभागले आहे. याचाच परिणाम म्ह्णून भारतात दोन टोकाचे गट निर्माण झाले असून त्यांच्यात सहिष्णुतेचा अभाव आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा