शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

सोशल मीडियावरचे माफिया आजही मला खुनी म्हणतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 19:26 IST

मी अनेक अग्निदिव्यांमधून गेलेलो आहे आणि काही अजूनही संपलेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी मी सोशल मीडियावर खरे अकाउंट असणाऱ्या व्यक्तीशी बोलायचो. पण आता तिथे ९५ टक्के लोक खोटे आणि ट्रोलर्स  आहेत. 

पुणे : मी अनेक अग्निदिव्यांमधून गेलेलो आहे आणि काही अजूनही संपलेली नाहीत. राजकारणात येण्यापूर्वी मी सोशल मीडियावर खरे अकाउंट असणाऱ्या व्यक्तीशी बोलायचो. पण आता तिथे ९५ टक्के लोक खोटे आणि ट्रोलर्स  आहेत.  राजकारणात प्रवेश केल्यावर माझ्याभोवती असणारे सुरक्षेचे कवच अचानक नाहीसे झाले आणि मी काही लोकांचे लक्ष्य झालो. आजही सोशल मीडियावर ९५ टक्के लोक हे ट्रोलर्स आहेत. आजही सोशल मीडियावरून टीका करणारे माफिया मला खुनी म्हणतात असे विधान खासदार शशी थरूर यांनी केले. 

पुण्यात आयोजित सातव्या पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलमध्ये 'व्हाय आय एम ए हिंदू ' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी हिंदुत्ववादावर मते मांडली. ते पुढे म्हणाले की, 'मी हिंदू असण्यामागे इतरांचा नाही तर माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे. या धर्मात व्यक्तीला  स्वतःच्या मतानुसार धर्माचे आचरण करता येते हेच वैशिष्टय आहे. अशी संधी कोणताही इतर धर्म देत नाही. उदाहरणार्थ मी रामाला मानतो तर दुसरी व्यक्ती हनुमान चालीसा पठण करते तर आम्ही दोघेही हिंदू ठरतो. मात्र एखादी व्यक्ती ते करत नसेल तरीही ती हिंदूच ठरते. फक्त धार्मिक नव्हे तर एकमेकांचे राजकीय विचारही मान्य करणे हेही लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सध्याच्या भारतीय राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, सध्या राजकारण हे राज्यकर्त्यांची आवड आणि कृती यात विभागले आहे. याचाच परिणाम म्ह्णून भारतात दोन टोकाचे गट निर्माण झाले असून त्यांच्यात सहिष्णुतेचा अभाव आहे. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसBJPभाजपा