शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 8:00 PM

५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य

ठळक मुद्दे५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्यआपण बंद खोलीत वचन देणारी व्यक्ती नसल्याचं म्हणाले होते शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलं का? असं म्हणत टोला लगावला. "अमित शाह यांना हे सर्व सांगायला सव्वा वर्ष लागलं. त्यातूनच किती पाणी मुरलंय हे कळून आलं. त्यांनी काय वेळ साधली. अमित शाह ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटले त्यावेळी ते केवळ पक्षप्रमुख होते. आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेतही याचा पुनरूच्चार केला होता. त्यावेळीही कोणतं उत्तर आलं नाही. जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले आणि थोडा वाद होत होता तेव्हा अमित शाह हे हरयाणात गेले. तेव्हा का सांगायला आले नाही?," असा सवाल सावंत यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अमित शाहंवर निशाणा साधला. "एकनिष्ठ, एक विचार आणि दिलेला शब्द मागे न घेणं यासाठी ठाकरे कुटुंबीय परिचित आहेत. आमचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता ज्या वेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी अमित शाहंनीच याची घोषणा केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच खोलीत बसून झालेली फसवणूक उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते अमित शाह ?महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले. शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitish Kumarनितीश कुमारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे