शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 20:03 IST

५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य

ठळक मुद्दे५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्यआपण बंद खोलीत वचन देणारी व्यक्ती नसल्याचं म्हणाले होते शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलं का? असं म्हणत टोला लगावला. "अमित शाह यांना हे सर्व सांगायला सव्वा वर्ष लागलं. त्यातूनच किती पाणी मुरलंय हे कळून आलं. त्यांनी काय वेळ साधली. अमित शाह ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटले त्यावेळी ते केवळ पक्षप्रमुख होते. आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेतही याचा पुनरूच्चार केला होता. त्यावेळीही कोणतं उत्तर आलं नाही. जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले आणि थोडा वाद होत होता तेव्हा अमित शाह हे हरयाणात गेले. तेव्हा का सांगायला आले नाही?," असा सवाल सावंत यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अमित शाहंवर निशाणा साधला. "एकनिष्ठ, एक विचार आणि दिलेला शब्द मागे न घेणं यासाठी ठाकरे कुटुंबीय परिचित आहेत. आमचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता ज्या वेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी अमित शाहंनीच याची घोषणा केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच खोलीत बसून झालेली फसवणूक उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते अमित शाह ?महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले. शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitish Kumarनितीश कुमारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे