शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं; अरविंद सावंतांचा अमित शाहंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 20:03 IST

५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्य

ठळक मुद्दे५०-५० चा फॉर्म्युला ठरल्यानंतर अमित शाहंनीच घोषणा केली होती, सावंत यांचं वक्तव्यआपण बंद खोलीत वचन देणारी व्यक्ती नसल्याचं म्हणाले होते शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी संवाद साधताना शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा यांनी सांगितलं होतं. यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमित शाह यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलं का? असं म्हणत टोला लगावला. "अमित शाह यांना हे सर्व सांगायला सव्वा वर्ष लागलं. त्यातूनच किती पाणी मुरलंय हे कळून आलं. त्यांनी काय वेळ साधली. अमित शाह ज्यावेळी उद्धव ठाकरे यांना भेटले त्यावेळी ते केवळ पक्षप्रमुख होते. आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विधानसभेत आणि विधानपरिषदेतही याचा पुनरूच्चार केला होता. त्यावेळीही कोणतं उत्तर आलं नाही. जेव्हा निवडणुकांचे निकाल लागले आणि थोडा वाद होत होता तेव्हा अमित शाह हे हरयाणात गेले. तेव्हा का सांगायला आले नाही?," असा सवाल सावंत यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी अमित शाहंवर निशाणा साधला. "एकनिष्ठ, एक विचार आणि दिलेला शब्द मागे न घेणं यासाठी ठाकरे कुटुंबीय परिचित आहेत. आमचा ५०-५० चा फॉर्म्युला ठरला होता ज्या वेळी पत्रकार परिषद झाली त्यावेळी अमित शाहंनीच याची घोषणा केली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच खोलीत बसून झालेली फसवणूक उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही," असंही ते म्हणाले.काय म्हणाले होते अमित शाह ?महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले. शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाArvind Sawantअरविंद सावंतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Nitish Kumarनितीश कुमारBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरे