शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

...तोवर हे सरकार अस्थिर होणार नाही; अजित पवारांनी सांगितले ठाकरे सरकार कधी पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 20:17 IST

Ajit Pawar News: शेतकरी आंदोलनात बसले आहेत. 15 वेळेला चर्चा होऊन ही निर्णय लागत नाही. म्हणजे चर्चा करणाऱ्यांना निर्णय घ्यायचाच नाही का अशी शंका येतेय. सुप्रिया सुळे भेटायला गेल्या तेव्हा अडथडे आणले. खासदारालाही भेटू देत नाही, असा आरोप अजित पवारांनी केला.

केंद्राच्या अर्थसंकल्पावर टीका करताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल सध्या काहीच बोलणार नाही, असे सांगितले. तसेच सहकारी पक्षांसोबत बोलून, मुख्यमंत्र्यासोबत बोलून काय ते ठरेल पण अर्थमंत्री म्हणून माझ्या मनात निश्चित काही योजना आहेत, असेही ते सांगण्यास विसरले नाहीत. (Ajit Pawar talk on State budget, Amit Shah, Adani-sharad pawar meet.)

अजून ही बाजारातील अनेक सेवांना ग्राहकांचा हवा तेवढा प्रतिसाद नाही. हळू हळू भीती कमी होईल, त्यानंतर बाजारात तेजी येईल आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, अशी आशाही पवारांनी व्यक्त केली. ते नागपूरमध्ये बोलत होते. कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्र सरकारने करायला हवा अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारला ते परवडणारे नाही. केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी  सुरुवातीला तशी घोषणा केली, परंतू नंतर त्याबाबत वेगवेगळी संभ्रमात टाकणारी वक्तव्ये केल्याचा आरोप पवारांनी केला. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याच्या वृत्ताचे अजित पवारांनी खंडन केले. आम्ही तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतो. ग्राम पंचायत निवडणुकीत आम्ही भाजप पेक्षा बरेच पुढे राहिलो. येणाऱ्या जिल्हा परिषद  निवडणुकांमध्ये चांगले निकाल मिळतील, असा दावाही पवारांनी केला. 

कोणतेही वक्तव्य करताना मंत्र्यांनी आर्थिक भार पडणार आहे, त्याचा अंदाज घेऊन बोलावे, अशी अपेक्षा असते.. कारण केलेली घोषणा तिजोरी पेलू शकणार का हे महत्वाचे आहे, असे वीज बिल माफीच्या घोषणेवर पवारांनी सांगितले. तसेच कोणत्याही मंत्र्याने शहानिशा न करता घोषणा केली असे मी म्हणणार नाही, परंतू त्या जागी अजित पवार जरी असला तरीही अंदाज घेऊन बोलले पाहिजे, असा सल्ला त्यांनी सहकारी मंत्र्यांना दिला. 

सरकारला कुठलाही धोका नाहीजेव्हापासून महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तेव्हा पासून तारखा सांगितल्या जातात. मात्र, तसे काही घडलेले नाही. जोवर या सरकारला तिन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांचा आशीर्वाद आहे, तोवर हे सरकार अस्थिर होणार नाही. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत, त्यांना अनेक लोक भेटत राहतात. त्यामुळे अदानी त्यांना भेटले म्हणून काही घडलं असे नाही, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांचे नाव न घेता पवारांनी दिले आहे. अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या दगाबाजीच्या आरोपावर देखील अजित पवारांनी भाष्य केले. जाऊ द्या कशाला शिळ्या कढीला ऊत आणता. स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. बंद दारा आड काय घडले हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असे ते म्हणाले. 

एल्गार परिषदशरजिलने जे वक्तव्य केले ते चूकच आहे. त्याने तसे वक्तव्य करायला नको होते. आणि तेव्हा जे स्टेज वर होते, त्यांनी ही त्याला थांबवायला पाहिजे होते. आता गुन्हा दाखल झाला आहे, निश्चित कारवाई होईल. यापुढे परवानगी देताना सरकार म्हणून आम्ही विचार करू की या व्यक्तीच्या वक्तव्यामुळे समाजात दुही निर्माण होते म्हणून त्याला बोलू देता कामा नये, असेही पवारांनी सांगितले. 

शेतकरी आंदोलनात बसले आहेत. 15 वेळेला चर्चा होऊन ही निर्णय लागत नाही. म्हणजे चर्चा करणाऱ्यांना निर्णय घ्यायचाच नाही का अशी शंका येतेय. सुप्रिया सुळे भेटायला गेल्या तेव्हा अडथडे आणले. खासदारालाही भेटू देत नाही. खिळे लावता आणि मग थोड्या वेळाने काढून घेता. म्हणजे सरकारच्या मनात काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित करत शेतकरी विरोधी भूमिकेचे सरकार असल्याचा आरोप पवारांनी केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाAmit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे