शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:24 IST

UP Election 2022: भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देओमप्रकाश राजभर चुकीची वक्तव्ये करतायेतआप नेते संजय सिंह यांची टीकाभागीदारी संकल्प मोर्चात बिघाडीची चिन्हे!

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करण्यास सुरुवात केली असून, काही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. यातच आता भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे. (up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha)

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओम प्रकाश राजभर आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर आता आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

आघाडीचे वृत्त खोटं, आधारहीन

प्रकाश राजभर आणि आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. आप पक्ष भागीदारी संकल्प मोर्चात सहभागी होणार असल्याचे वृत्त, चर्चा खोट्या आणि आधारहीन आहेत. राजभर चुकीची वक्तव्ये करत आहेत. केजरीवाल यांनी राजभर यांची भेट घेतलेली नसून, कोणत्याही मोर्चा, आघाडीत आप आताच्या घडीला तरी सहभागी होत नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

निवडणुकीवेळी भाजपला आठवण होते

यापूर्वी बोलताना, भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते, असा दावा राजभर यांनी केला आहे. 

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

दरम्यान, एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी