शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:24 IST

UP Election 2022: भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देओमप्रकाश राजभर चुकीची वक्तव्ये करतायेतआप नेते संजय सिंह यांची टीकाभागीदारी संकल्प मोर्चात बिघाडीची चिन्हे!

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करण्यास सुरुवात केली असून, काही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. यातच आता भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे. (up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha)

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओम प्रकाश राजभर आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर आता आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

आघाडीचे वृत्त खोटं, आधारहीन

प्रकाश राजभर आणि आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. आप पक्ष भागीदारी संकल्प मोर्चात सहभागी होणार असल्याचे वृत्त, चर्चा खोट्या आणि आधारहीन आहेत. राजभर चुकीची वक्तव्ये करत आहेत. केजरीवाल यांनी राजभर यांची भेट घेतलेली नसून, कोणत्याही मोर्चा, आघाडीत आप आताच्या घडीला तरी सहभागी होत नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

निवडणुकीवेळी भाजपला आठवण होते

यापूर्वी बोलताना, भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते, असा दावा राजभर यांनी केला आहे. 

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

दरम्यान, एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी