शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

UP Election 2022: उत्तर प्रदेशात भाजपविरोधी संकल्प मोर्चात बिघाडी; आघाडी करण्यास ‘आप’चा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 13:24 IST

UP Election 2022: भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे.

ठळक मुद्देओमप्रकाश राजभर चुकीची वक्तव्ये करतायेतआप नेते संजय सिंह यांची टीकाभागीदारी संकल्प मोर्चात बिघाडीची चिन्हे!

नवी दिल्ली: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी बहुतांश पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपविरोधी पक्षांनी आघाडी करण्यास सुरुवात केली असून, काही पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत आहेत. यातच आता भाजपला विरोध म्हणून स्थापन करण्यात आलेल्या भागीदारी संकल्प मोर्चात बिघाडी झाल्याचे दिसत आहे. या आघाडीमध्ये सहभागी होण्यास आम आदमी पक्षाने नकार दिला आहे. (up election 2022 aap refused alliance with bhagidari sankalp morcha)

सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओम प्रकाश राजभर आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर आता आप नेते संजय सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम

आघाडीचे वृत्त खोटं, आधारहीन

प्रकाश राजभर आणि आप नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात कोणतीही बैठक झालेली नाही. आप पक्ष भागीदारी संकल्प मोर्चात सहभागी होणार असल्याचे वृत्त, चर्चा खोट्या आणि आधारहीन आहेत. राजभर चुकीची वक्तव्ये करत आहेत. केजरीवाल यांनी राजभर यांची भेट घेतलेली नसून, कोणत्याही मोर्चा, आघाडीत आप आताच्या घडीला तरी सहभागी होत नाही, असे आप नेते संजय सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका

निवडणुकीवेळी भाजपला आठवण होते

यापूर्वी बोलताना, भाजप हे एक बुडते जहाज आहे. ज्यांना त्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण आम्ही जाणार नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, तेव्हाच भाजपला लहान पक्ष आणि मागासवर्ग समाजाची आठवण होते. मात्र, जेव्हा मुख्यमंत्रीपदाची चर्चा केली जाते, तेव्हा बाहेरून माणसे आणली जातात. केवळ मतांसाठी भाजप मागासवर्ग समाजाला जवळ करते, असा दावा राजभर यांनी केला आहे. 

“नितेश राणे यांच्याकडे जी प्रगल्भता आहे, ती दुर्दैवाने शिवसेनेकडे नाही”; भाजपचा टोला

दरम्यान, एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनyogi adityanathयोगी आदित्यनाथAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदी