शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

coronavirus: "कोरोनाकाळात महाराष्ट्रात सर्वोत्तम काम, बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले पण…”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:00 AM

Sanjay Raut Criticize Central Government : कोरोनामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India) दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहेउद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेलकोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात यावे

मुंबई - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या फैलावामुळे देशातील परिस्थिती  (coronavirus in India)दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. (Sanjay Raut Criticize Central Government) कोरोनाकाळात महाराष्ट्राला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न झाले. मात्र कोरोनाकाळात सर्वोतम काम महाराष्ट्रातच होत आहे. त्यामुळे आता देशातही महाराष्ट्र मॉडेलप्रमाणेच काम करावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. (Shiv Sena Leader Sanjay Raut Says,"The best work in Maharashtra during the Coronavir era, there were many attempts to discredit but..")

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकंदरीत परिस्थिती पाहता देशाला महाराष्ट्र मॉडेलप्रमाणे काम करावे लागेल. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोरोनाकाळात महाराष्ट्रामध्ये उत्तम काम होत आहे. आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ज्या पद्धतीनं संकटाशी सामना करतोय,  त्याची सर्वांनाच दखल घ्यावी लागेल. 

कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले की, देशातील आजची परिस्थिती पाहता हे राष्ट्रीय संकटच आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्राद्वारे, चर्चेमध्ये कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची सातत्याने मागणी करत आहेत. ही परिस्थिती राष्ट्रीय आपत्ती असल्याचे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे आता या कोरोनाच्या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आले पाहिजे. 

 दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीच्या जाणवत असलेल्या तुटवड्याबाबत भाष्य करताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे मागणी केली असेल तर केंद्राने तिची पूर्तता केली पाहिजे, असे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोनाबाधिकांचा आकडा बऱ्यापैकी स्थिरावला आहे. काल राज्यात कोरोनाच्या ६३ हजार ३०९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ६१ हजार १८१ जणांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात सध्या कोरोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ अॅक्टिव रुग्ण आहेत.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी