शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Corona vaccine :"लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही", भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 14:36 IST

Corona vaccination in Maharashtra : राज्यात कोरोनावरील लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे.

मुंबई - एकीकडे राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत दररोज मोठी भर पडत आहे. तर दुसरीकडे राज्यात कोरोनावरील लसींचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. (Corona vaccination in Maharashtra) त्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक अनेक लसीकरण केंद्रावरील लसीकरण बंद करावे लागले आहे. कोरोनाच्या लसींच्या कमी पुरवठ्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केंद्र सरकारवर टीका केही होती. तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलेले आहे. दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाच्या लसीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ("There is a vaccine but no order to give it'' BJP MLA Atul Bhatkhalkar Serious allegations on State Government)

कोरोना लसीचा महाराष्ट्राला कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगून केंद्रावर टीका करणाऱ्या राज्य सरकारला ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे, त्यात ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये लसी आहे, पण लसी देण्याची ऑर्डर नाही आहे. ठाकरे सरकारने आता कोरोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, किती हा बेशरमपणा? असा टोला लगावला आहे. 

गेल्या काही दिवसांत राज्यात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. गुरुवारी महाराष्ट्रामध्ये ५६ हजार २८६ रुग्णांची नोंद झाली होती. तर दिवसभरात ३७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाचे लसीकरण वाढवण्याची मागणी होत आहे. तसेच त्यासाठी राज्याला दर आठवड्याला किमान ४० लाख डोस मिळाले पाहिजेत, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केली होती. मात्र केंद्राकडून राज्याला कोरानाच्या लसींचा म्हणावा तसा पुरवठा होत नाही आहे, आसा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAtul Bhatkalkarअतुल भातखळकर