शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 16:34 IST

Prakash Javdekar told Maharashtra has 23 lakhs corona vaccine today: राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून खूप विचित्र घटना घडू लागल्या आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackreay) आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) सचिन वाझेला (Sachin Vaze) अटक झाली तेव्हा त्याची बाजू मांडत होते. त्याला वाचवत होते. शिवसेनेने भाजपाच्या, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले आणि नंतर गद्दारी करत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यानंतर जावडेकरांनी राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर भाष्य केले. (No Corona Vaccine Shortage in Maharashtra, Prakash javdekar says lack of Management in Maharashtra Government.)

महाराष्ट्रात 23 लाख डोसेस आहेत. दिवसाला जेवढे डोस द्याल त्यापेक्षा जास्त डोस दुसऱ्यादिवशी दिले जातात. आता हे डोस जिल्ह्यांना पाठविणे, तेथून तहसील आणि तहसीलवरून  तालुक्यांच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलला पाठविणे हे काही केंद्र सरकारचे काम नाहीय. ते राज्य सरकारचे आहे. त्यांची जबाबदारी आहे. केंद्र सरकार राज्यांच्या क्षमतेनुसार त्यापेक्षा आजच्यापेक्षा जास्त कोटा देते, असे जावडेकर म्हणाले. 

महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले. कारण त्यांना नियोजनच करण्यात आले नाही. एक व्हायलमध्ये दहा डोस असतात. चार-पाच लोक आले त्यांना डोस दिला बाकीचा खराब झाला. असे कसे चालेल. तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल. राज्य सरकार आपले काम ठीक करत नसून दुसऱ्यांना दोष देत आहे. मी महाराष्ट्राची पूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही अन्य राज्यांची माहिती घ्यावी. राज्यात सध्या 5 ते 6 दिवसांची लस शिल्लक असल्याचे जावडेकर म्हणाले. 

राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर महाराष्ट्राला मुद्दामहून लस दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच अन्य राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जात असल्याचा आरोप झाला आहे. तर केंद्राकडून महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नसल्याचे प्रत्यूत्तर दिले जात आहे. 

 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस