शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : मार्करमच्या सेंच्युरीच्या जोरावर द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम; ऐतिहासिक विजयासह साधला बरोबरीचा डाव
2
“माझ्या भावाला BJPशी मैत्री हवी, पण मुनीर भारताशी युद्ध…”; इम्रान खानची बहीण नेमके काय म्हणाली?
3
दिल्ली पोटनिवडणुकीत भाजपाला धक्का, काँग्रेसने खाते उघडले; आम आदमी पक्षाचे काय झाले?
4
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
5
नगर पंचायत-परिषदा निवडणुकीचा मुद्दा संसदेत; सुप्रिया सुळेंचे सरकारवर टीकास्त्र, म्हणाल्या...
6
"हे लोक अणुबॉम्बला एवढे घाबरत नाहीत, जेवढे...!" जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष अरशद मदनी यांचं विधान
7
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत पसरेल अंधकार, कोणकोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
8
अजय देवगनकडे या कंपनीचे १०००००० शेअर, आता कंपनीने  घेतला मोठा निर्णय; दिलाय 6000% चा बंपर परतावा!
9
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
10
60% हूनही अधिक घसरला ओला इलेक्ट्रिकचा शेअर, गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ!
11
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
12
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
13
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
14
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
15
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
16
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
17
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
18
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
19
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
20
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine Shortage: महाराष्ट्राने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल? प्रकाश जावडेकरांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 16:34 IST

Prakash Javdekar told Maharashtra has 23 lakhs corona vaccine today: राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून खूप विचित्र घटना घडू लागल्या आहेत. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackreay) आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) सचिन वाझेला (Sachin Vaze) अटक झाली तेव्हा त्याची बाजू मांडत होते. त्याला वाचवत होते. शिवसेनेने भाजपाच्या, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले आणि नंतर गद्दारी करत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही अशी टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. यानंतर जावडेकरांनी राज्यातील कोरोना लसीच्या तुटवड्यावर भाष्य केले. (No Corona Vaccine Shortage in Maharashtra, Prakash javdekar says lack of Management in Maharashtra Government.)

महाराष्ट्रात 23 लाख डोसेस आहेत. दिवसाला जेवढे डोस द्याल त्यापेक्षा जास्त डोस दुसऱ्यादिवशी दिले जातात. आता हे डोस जिल्ह्यांना पाठविणे, तेथून तहसील आणि तहसीलवरून  तालुक्यांच्या सरकारी, खासगी हॉस्पिटलला पाठविणे हे काही केंद्र सरकारचे काम नाहीय. ते राज्य सरकारचे आहे. त्यांची जबाबदारी आहे. केंद्र सरकार राज्यांच्या क्षमतेनुसार त्यापेक्षा आजच्यापेक्षा जास्त कोटा देते, असे जावडेकर म्हणाले. 

महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले. कारण त्यांना नियोजनच करण्यात आले नाही. एक व्हायलमध्ये दहा डोस असतात. चार-पाच लोक आले त्यांना डोस दिला बाकीचा खराब झाला. असे कसे चालेल. तुम्हाला त्याचे नियोजन करावे लागेल. राज्य सरकार आपले काम ठीक करत नसून दुसऱ्यांना दोष देत आहे. मी महाराष्ट्राची पूर्ण माहिती घेतली आहे. तुम्ही अन्य राज्यांची माहिती घ्यावी. राज्यात सध्या 5 ते 6 दिवसांची लस शिल्लक असल्याचे जावडेकर म्हणाले. 

राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोना लस नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. यावरून गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरु झाला आहे. एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रावर महाराष्ट्राला मुद्दामहून लस दिली जात नसल्याचा आरोप केला आहे. तसेच अन्य राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिली जात असल्याचा आरोप झाला आहे. तर केंद्राकडून महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नसल्याचे प्रत्यूत्तर दिले जात आहे. 

 

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRajesh Topeराजेश टोपेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस