शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Sanjay Rathod: "खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र’’, त्या आरोपांना संजय राठोड यांचे प्रत्युत्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:23 IST

Sanjay Rathore News: पूजा चव्हाण आत्महत्या प्रतरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड हे आता अजून एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत.

औरंगाबाद - पूजा चव्हाण आत्महत्या प्रतरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेना नेते संजय राठोड हे आता अजून एका महिलेने केलेल्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. (Sanjay Rathore) संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करून लैंगिक छळ केल्याचा आरोप एका महिलेने  दरम्यान, या आरोपांना आता संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.  ("Conspiracy to end my political life by making false allegations", Sanjay Rathore responds to those allegations)

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी ट्विट करीत संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडन केले.  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्यातील पहूरनजीक शिवपुरी येथे छत्रपती शिवाजी कला शिक्षण विकास कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान ही संस्था आहे. या संस्थेचा मी सचिव होतो. संस्थेतील तीन शिक्षकांना अनियमिततेच्या कारणावरून २०१७ मध्ये निलंबित करण्यात आले होते. या शिक्षकांनी समाज कल्याण विभागाकडे दाद मागितली. त्यानंतर आयुक्तांकडे प्रकरण गेले. या दोनही ठिकाणी संस्थेच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झाले आहे. दरम्यानच्या काळात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर तीन शिक्षकांना संस्थेने नियुक्ती दिली. यातील एका शिक्षकाने स्वत:हून राजीनामा दिला. तसे पत्रही संस्थेकडे आहे. हाच शिक्षक पुन्हा संस्थेमध्ये घेण्याची मागणी करीत आहे. यावर न्यायालयाचा जो काही निर्णय येईल त्यानंतर याबाबत ठरवू, असे मी त्याला स्पष्ट केले. मात्र, माझ्यावर तसेच संस्थेवर विविध प्रकारे दबाव आणण्यात येऊ लागला.

दरम्यानच्या काळात फेब्रुवारीतील प्रकरणानंतर माझ्यावर बदनामीकारक आरोप सुरू झाले. विविध पाच निनावी मोबाईल क्रमांकांवरून मला धमक्यांचे फोनही आले. संजय जयस्वाल या संस्थेतील मुख्याध्यापकाला नामसाधर्म्यामुळे धमकीचे मॅसेज प्राप्त झाले. त्यामुळे २४ मे रोजी वडगाव पोलीस ठाण्यात जयस्वाल यांनी तक्रार दिली आहे. त्यानंतर तुझे राजकीय अस्तित्व संपवू, असे मॅसेज मला आले. त्यामुळे २७ जुलै रोजी यवतमाळ शहरातील अवधुतवाडी ठाण्यात तक्रार केलेली आहे. याच प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर केला जात असल्याचे संजय राठोड म्हणाले. अत्यंत खालच्या थराला जाऊन सध्या राजकारण केले जात आहे. मी आणि माझे कुटुंबीय मागील प्रकरणात कोणत्या मानसिकतेतून गेलो असेल याची कल्पना करावी आणि अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही, असे सांगत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी माझी स्वत:ची इच्छा आहे. पोलीस अधीक्षकांनाही त्याबाबत सांगितले असल्याचे ते म्हणाले.  खोट्या तक्रारी करून माझे राजकीय जीवन संपविण्याचे षडयंत्र आखण्यात आले आहे. मात्र अशा आरोपाने माझे राजकारण संपणार नाही. या आरोपांची चौकशी करा सत्य समोर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले.महिलांना पुढे करून सदर प्रकरणाचा आता राजकारणासाठी वापर करण्यात येत आहे, असा आरोपही संजय राठोड यांनी केला.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बीड जिल्ह्यातील टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर अनेक दिवसांपासून संजय राठोड यांना अटक करा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण