शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

Lok Sabha: लोकसभेत खासदारांचे संख्याबळ १००० होणार? मोदी सरकारचा प्रस्ताव; काँग्रेसचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:11 AM

Lok Sabha: विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे.

ठळक मुद्देलोकसभेत खासदारांची संख्या १ हजारवर जाणार?केंद्रातील मोदी सरकारचा प्रस्तावकाँग्रेस नेते मनिष तिवारी यांचा मोठा दावा

नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिला आठवडा पॅगेसस हेरगिरी प्रकरण आणि इंधनदरवाढ तसेच महागाई यांसारख्या मुद्द्यांवरून चांगलाच गाजला. अनेकदा दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करावे लागले. विविध विषयांवरून विरोधक केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता लोकसभेत खासदारांचे संख्याबळ एक हजारांवर नेण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केली असून, तसा उल्लेख एका प्रस्तावात करण्यात आल्याचा मोठा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. (congress manish tiwari claims modi govt proposal to increase strength of lok sabha to thousand mp)

काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून सदर दावा केला आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या आधी खासदारांचे संख्याबळ वाढवत १ हजार किंवा त्यापेक्षा जास्त असावे, असा उल्लेख केंद्र सरकारच्या प्रस्तावात असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे. 

याला म्हणतात रिटर्न! TATA ग्रुपच्या ‘या’ कंपनीची कमाल; गुंतवणूकदारांचे केले १ लाखाचे ८७ लाख

नवीन संसदेत १ हजार जणांची आसनव्यवस्था

संसदेतील माझ्या काही विश्वासार्ह सहकाऱ्यांनी, सन २०२४ पूर्वी लोकसभेचे संख्याबळ १ हजार किंवा त्याहून जास्त वाढवण्याचा भाजपाचा प्रस्ताव असल्याची माहिती दिली आहे. नवीन संसद भवन १ हजार जण बसू शकतील, अशा पद्धतीने बांधले जात आहे. पण हे करण्याआधी यावर गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे. ती सार्वजनिक असावी, असे ट्विट मनिष तिवारी यांनी केले आहे. 

हे मान्य नाही

मनिष तिवारी यांच्या ट्विटवर काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात सार्वजनिक वाद-विवाद होणे आवश्यक आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात लोकांमधून निवडून येणाऱ्या जास्तीत जास्त लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. पण ही वाढ जर लोकसंख्येच्या आधार होत असेल तर दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होईल आणि हे मान्य नाही, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

हर हर महादेव! ‘या’ अद्भूत शिव मंदिराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश; PM मोदींच्या शुभेच्छा

दरम्यान, आताच्या घडीला लोकसभेत ५४३ आणि राज्यसभेत २४५ सदस्य आहेत. संसदेची नवी इमारत उभारली जात असून, सरकारने लोकप्रतिनिधींची संख्या वाढवण्याचं संकेत सरकारने दिली आहे. लोकसभा संपूर्ण देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व करत असून भविष्यात खासदारांची संख्या वाढवली जाऊ शकते, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाParliamentसंसदcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण