शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:32 IST

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणौतमध्ये वाकयुद्ध सुरू

मुंबई: अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्यात जुंपली आहे. त्यातून दोन्ही बाजूनं आव्हानांची भाषा केली जात आहे. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. त्यातच आता या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता विधानसभेतून कंगनावर निशाणा साधला.आजपासून विधिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुखर्जींच्या आठवणींना उजाळा दिला. प्रणब मुखर्जी अतिशय शांत, संयमी, संवेदनशील आणि अभ्यासू व्यक्तीमत्त्व होतं. कोणत्याच पक्षात त्यांचे शत्रू नव्हते. सगळ्यांनाच ते आपलेसे वाटायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावाशिवसेना नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनाबद्दलही मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं. 'अनिल राठोड यांच्या शोक प्रस्तावावर मला बोलावं लागेल, असा विचारही मी कधी केला नव्हता. अनिल राठोड राजस्थानातून महाराष्ट्रात आले. मुंबई, मंचरनंतर नगरला गेले. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन त्यांनी चांगलं काम केलं', असं मुख्यमंत्री म्हणाले. अनेक जण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजीरोटी कमावतात. नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात. काही जण मानत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता कंगना राणौतला टोला लगावला.काय आहे प्रकरण?अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.कंगना राणौतच्या सुरक्षेसाठी ‘इतके’ जवान तैनात; ‘Y’ दर्जाची सुरक्षा म्हणजे काय रे भाऊ?, जाणून घ्या...काय म्हणाले संजय राऊत?कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.“शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत"​​​​​​​मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर अडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौत