शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 5:43 AM

अशोक चव्हाण यांचे भाजपचा दहशतवाद संपवण्याचे आवाहन

मीरा रोड : मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. आता त्यांचे संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे सरकार देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी हे सरकार घालवणे आवश्यक आहे. देशासाठी जे बलिदान द्यावे लागेल, ते देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. लोकसभा निवडणुकीत आपण सर्व विरोधी पक्षांनी जशी एकजूट दाखवली, तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून देशापाठोपाठ राज्यातील भाजपा युतीची सत्ता संपवून टाकू, असा निर्धारही पवार यांनी केला.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे सावरकर चौकाजवळ मेडतिया मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी पवार येथे आले होते. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, अमर राजुरकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटाबंदी केली. काळा पैसा सामान्यांकडे नसतो तर मोठ्यांकडे असतो. पैसा काढला तो सामान्यांचा. मोदींना स्वीस बँकेतून अजून पैसा आणता आला नाही, असे पवार म्हणाले. जीएसटी आणून देशातील लहान व्यापाºयांना मोदींनी संकटात टाकले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींना पाठिंबा दिला, तेच दु:खी आहेत. तीच अवस्था उद्योग क्षेत्राची आहे. काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत उद्योग वाढवले नाहीत. त्याचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या रोजगाराला बसला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील भाजपचा दहशतवाद रोखण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनी काय खायचे, काय बोलायचे हे सरकारच ठरवत आहे. याच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो. भाजपच्या दहशतवादापासून देश मुक्त करणे गरजेचे आहे.‘शेतकºयांंसाठी ठोस धोरण नाही’पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा