शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

“ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री अन् राऊत म्हणजे नॉटी बॉय” - भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 8:18 AM

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.

ठळक मुद्देभाजपा आमदाराचा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणाकंगना राणौत नॉटी गर्ल असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर...ताकद म्हणजे विश्वासघात, भाजपाने घेतला समाचार

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना या वादात भाजपानेही उडी घेतली आहे. कंगनाला हरामखोर असा शब्द वापरल्याने शिवसेना नेते संजय राऊत अडचणीत आले. अनेकांनी राऊतांच्या या विधानाला आक्षेप घेत शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणीचा अपमान केला असा आरोप केला. त्यानंतर या शब्दावरुन संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिले.

नॉटी अन् बेईमान या शब्दाला मराठी भाषेत हरामखोर म्हटलं जातं. कंगनाही नॉटी गर्ल आहे. तिची वक्तव्ये नेहमी अशाच प्रकारे असतात असं सांगत संजय राऊतांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. त्यांनी ट्विट मध्ये म्हटलं की, हरामखोर म्हणजे नॉटी गर्ल या धर्तीवर...ताकद म्हणजे विश्वासघात, सोनिया म्हणजे नवमातोश्री, अस्मिता म्हणजे रिया, शिवसेना म्हणजे हिंदुत्व आणि राऊत म्हणजे नॉटी बॉय आहेत असा टोला लगावला.

यापूर्वीही अतुल भातखळकर यांनी अनेकदा शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेच्या तोंडाळ नेत्यांना कंगना राणौतनं उघड आव्हान दिलंय. जिने बॉलिवूडच्या इस्लामी माफियांना भीक घातली नाही, ती नवं बाटग्या सेक्युलर शिवसेनेसमोर झुकेल काय? दाऊदला दम देण्याच्या बाता मारणारे आपले शौर्य एका बाईला दाखवतायत अशा शब्दात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा समाचार घेतला होता.

तर माझी ताकद काय आहे, हे १०५ निवडून आल्यानंतर विरोधात बसलेत त्यांना विचारा असं राऊत म्हणाले होते. त्यावर विश्वासघाताने १०५ संख्या असलेल्या पक्षाला विरोधी पक्षात बसावे लागले हे खरे. सत्ता हाती आहे, परंतु धमक नसल्याने मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडत नाही त्याचे काय? घरात कडी लावून बसायला सत्ता हस्तगत केली होती काय? असा सवालही आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला होता.

नॉटी गर्लवरुन अमृता फडणवीसांनीही डिवचलं

आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत असं सांगत अमृता फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

कंगनाला Y दर्जाची सुरक्षा

मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे.

कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी आता ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौत