शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज; “घ्या निवडणुका, MVA ला बहुमत मिळालं तर...”

By प्रविण मरगळे | Published: January 19, 2021 1:17 PM

निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाली असा शिवसेनेचा दावा आहेतर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत?भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचं शिवसेनेला आव्हान

मुंबई – राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी स्पष्ट लागले, या निवडणुकीत अनेकांना धक्के बसले. परंतु निकालावरून अद्यापही सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष भाजपात दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपानेच जिंकल्याचा दावा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस करत आहेत, तर महाविकास आघाडीला जनतेने साथ दिली आहे, त्यामुळे जनतेचा सरकारला कौल नाही असं म्हणणाऱ्यांच्या घरावरील कौल जनतेने काढून घेतली आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला होता.

यावरून आता भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. भातखळकर म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर वन आहे, परंतु तरीही भाजपाची माती झाली असा शिवसेनेचा दावा असेल तर घ्या निवडणुका. MVA(महाविकास आघाडी) ला बहुमत मिळाले तर जनतेच्या विश्वासघाताच्या आरोपातून मुक्ती मिळेल. है हिंमत? असं खुलं चॅलेंज त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.

भाजपा'च नंबर १; शिवसेना महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही  

निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, राज्यातील गावागावातील लोकांनी भाजपला समर्थन दिलं आहे. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा नंबर एकचा पक्ष बनला आहे. लॉकडाऊनकाळात केंद्र सरकार लोकांच्या पाठीशी उभं राहिलं. तर राज्य सरकारने कुणालाही मदत केली नाही. यामुळे लोकांचा महाविकास आघाडी सरकारवर आता विश्वास उरलेला नाही" राज्यात गावागावांमध्ये काही आम्ही प्रचाराला जात नाही. तेथील स्थानिक पातळीवरील कार्यकर्तेच मेहनत घेत असतात. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाराष्ट्रात काही भागात वर्चस्व आहे. शिवसेना हा काही महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. पण भाजपाचं असं नाही. भाजप संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आम्हाला तिन्ही पक्षांच्या विरोधात यावेळी लढावं लागलं. त्यामुळे आम्हाला आता संपूर्ण महाराष्ट्रात स्पेस आहे असं त्यांनी सांगितले.

बिनविरोध मिळालेल्या ग्रा. पंचायती

निवडणूक बिनविरोध करण्यात स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना ५२० ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाShiv Senaशिवसेनाgram panchayatग्राम पंचायत