शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

MPSC: “अजित पवारांना फक्त स्वत:च्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता, इतरांचं काही पडलेलं नाही”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 13:04 IST

MPSC: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे.

ठळक मुद्देखोटे बोलत अजित पवारांकडून सभागृहाची दिशाभूलअजित पवारांना मुलाच्या पुनर्वसनाची चिंता भाजप आमदाराचे अजित पवार यांच्यावर टीकास्त्र

सांगली: गेल्या महिन्यात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळाली नाही. शेवटी नैराश्यामुळे पुण्यातील एका मुलाने आत्महत्या केली होती. यावरून ठाकरे सरकारवर भाजपसह अन्य विरोधी पक्षांची चांगलीच टीकेची झोड उठवली होती. यानंतर ३१ जुलैपर्यंत एमपीएससीद्वारे राज्यातील रिक्त जागा भरू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. यासंदर्भात अजित पवार यांच्यावर निशाणा साधत भाजप आमदाराने राज्यात पुन्हा स्वप्नील लोणकर प्रकरणाची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा सरकारला आहे काय? उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फक्त त्यांच्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता आहे काय, अशी विचारणा केली आहे. (bjp gopichand padalkar criticises ajit pawar over mpsc)

गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकरराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर टीका करताना दिसत आहेत. MPSC च्या परीक्षा रखडल्याच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले.

...तरच मागणी मान्य होऊ शकेल; मोदी सरकारने Tesla समोर ठेवली ‘ही’ अट!

अजित पवारांची खोटे बोलत दिशाभूल

३१ जुलैपर्यंत राज्यातील रिक्त जागा एमपीएससीद्वारे भरू, अशी घोषणा त्यांनी सभागृहात केली होती. पण, सभागृहातून बाहेर पडताच MPSC आयोगावरील रिक्त सदस्यांच्या चार जागा भरू, असा त्यांनी शब्द फिरवला. खोटे बोलत अजित पवारांनी सभागृहाची दिशाभूल केली. ३१ जुलै उलटून गेला तरीही MPSC ची कोणतीही परीक्षा झालेली नाही. तसेच आयोगावरील सदस्यांच्या रिक्त जागाही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या सरकारला MPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत काहीच देणेघेणे नाही, असे वाटते, असे पडळकर यांनी म्हटले आहे. 

“GST भरायला नकार द्या! मग केवळ CM उद्धव ठाकरेच नाही, तर PM मोदीही तुमच्याकडे येतील”

अजित पवारांना मुलाच्या पुनर्वसनाची चिंता 

कदाचित पुन्हा एकदा स्वप्नील लोणकर या होतकरू विद्यार्थ्याने निवडलेला आत्महत्येचा मार्ग आणखी काही विद्यार्थ्यांनी निवडावा, असे या प्रस्थापितांच्या सरकारला वाटतेय काय? म्हणूनच अजित पवारांनी सभागृहात दिलेला शब्द पाळला नाही. याचा अर्थ ते अधिवेशनातही धडधडीत खोट बोलत होते. या प्रस्थापितांना फक्त आपल्याच पोराबाळांच्या आमदारकी, खासदारकीचे पडले आहे. बाकी किती स्वप्नील लोणकर येतील जातील याविषयी त्यांना काहीही पडलेले नाही, असा घणाघात पडळकर यांनी यावेळी केला.  

टॅग्स :PoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसparth pawarपार्थ पवारMPSC examएमपीएससी परीक्षा