"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 13:00 IST2021-02-14T12:56:11+5:302021-02-14T13:00:10+5:30

BJP Chandrakant Patil Slams Thackeray Government : अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.

BJP Chandrakant Patil Slams Thackeray Government On facebook post | "महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"

"महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकाला छिद्रे, मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस"

मुंबई - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय" अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला अशी घणाघाती टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. "महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळी बाभडी जनता करत आहे, परंतु विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर येत आहे" असं म्हटलं आहे. 

चंद्रकांत पाटील यांचा धनंजय मुंडेंवरही जोरदार टीका केली आहे. "काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कबुली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही" असं म्हटलं आहे. तसेच "काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकार मधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ED ने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे."

"हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची लावली पट्टी"

"आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधातील एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते" असं देखील चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. "ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री यांच्या मतदारसंघात सतत हिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणाऱ्या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना– राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला" असा आरोप देखील चंद्रकांत पाटील यांनी केला.

Web Title: BJP Chandrakant Patil Slams Thackeray Government On facebook post