शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"ममतांचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 20:36 IST

bengal assembly elections : आगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देसोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली.

कोलकाता : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यावर, गेल्या काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केलेल्या शुभेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही तर राजकारण सोडून देईन, असे म्हटले आहे.

सोमवारी सायंकाळी दक्षिण कोलकाता येथे झालेल्या जाहीर सभेत शुभेंदु अधिकारी बोलत होते. यावेळी टीएमसी ही पार्टी नसून खासगी लिमिटेड कंपनी आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले. याचबरोबर, ममता बॅनर्जींच्या राजकीय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जर तृणमूल काँग्रेसला बिहारमधून निवडणूक रणनीतिकार (प्रशांत किशोर) नियुक्त करण्याची गरज भासली असेल तर यामुळे हे सिद्ध होते की, राज्यात भाजपाची वाढ होत आहे, असे शुभेंदु अधिकारी म्हणाले.

याचबरोबर, नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक लढण्याची घोषणा केल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनीही जाहीर केले की, ममता बॅनर्जींचा पराभव केला नाही, तर राजकारण सोडून देईन. ते म्हणाले, "जर नंदीग्राममध्ये मी त्यांना (ममता बॅनर्जी) दीड लाखाहून अधिक मतांनी हरवले नाही तर मी राजकारण सोडून देईन." दरम्यान, ममता बॅनर्जी यांना भवानीपुरमधून जिंकू येऊ, असा विश्वास नाही. त्यामुळे त्या नंदीग्राममध्ये निवडणूक लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. टीएमसीचे मंत्री सुरक्षित जागांचा शोध घेत आहेत. मात्र, ते कोठे जातात, यामुळे काही फरक पडत नाही, त्यांना काहीही मिळणार नाही, असे पश्चिम बंगालमधील भाजपा अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले. 

ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणारआगामी विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून  निवडणूक लढणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केले आहे. सोमवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममध्ये निवडणूक रॅली घेतली. यावेळी मला नंदीग्राममधून निवडणूक लढवायची आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. ममता बॅनर्जींनी हे आवाहन स्टेट युनिटच्या अध्यक्षांना स्टेजवरच केले आणि तेथे तातडीने याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच, यंदाही राज्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार स्थापन होईल. तृणमूल काँग्रेसला २०० हून अधिक जागा मिळतील, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारणBJPभाजपाtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक