शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

“RSS चे मोहन भागवत खरंच देशभक्त असतील, तर त्यांनी...”; ओवेसींचे खुले आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 14:49 IST

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे.

ठळक मुद्देभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी RSS चीपंतप्रधान मोदी चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतातनोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका

हैदराबाद: आताच्या घडीला देशात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, इंधनदरवाढ, महागाई यांसह भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून सुरू असलेला संघर्ष याचाही समावेश आहे. देशाने आत्मनिर्भर व्हायला हवे. आपण जेवढं आत्मनिर्भर असू तेवढेच सुरक्षित असू, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. यावर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निशाणा साधला असून, नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याची टीका केली आहे. (aimim asaduddin owaisi criticized rss mohan bhagwat over indian economy and china border dispute)

“मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. मोहन भागवत म्हणतात की आपण चीनवर अवलंबून राहायला नको. मग देशावर नोटाबंदी कोणी लादली, देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्यासाठी कोण जबाबदार आहे, असा सवाल करत याचे उत्तर केवळ मोदी सरकार आहे, या शब्दांत असदुद्दीन ओवेसी केंद्रातील मोदी सरकार आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

मोहन भागवत खरंच खरे देशभक्त असतील, तर... 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची विचारसरणी RSS ची आहे, ते चीन विरोधात चकार काढायलाही घाबरतात. त्यामुळे जर भागवत हे खरे देशभक्त आहेत तर, त्यांनी सर्वांसमोर येऊन चीनी सैन्याने भारतात घुसखोरी हे मान्य करावे. कोरोना महामारीत मोदी सरकारने जनतेसाठी आणलेल्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झालेय. मोहन भागवत तुम्हाला देशातील जनतेची ही स्थिती बघवत आहे का, असा सवाल करत मोहन भागवत यांचे विधान बोगस आहे, असल्याचा घणाघात ओवेसी केला आहे. चीनी सैनिक भारतात घुसून बसले आहेत, ही वास्तविकता आहे आणि ती मोहन भागवतांना दिसत नाही. देशातील सध्याची आर्थिक परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे आहे. नोटाबंदीचे दुष्परीणाम देश अद्यापही भोगत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे. 

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

दरम्यान, आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. जे मूळ रूपाने भारतातून येच नाही. आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणे कमी होणार नाही, तोवर चीनसमोर झुकावे लागेल. आत्मनिर्भर बनताना उत्पादनाच्या उत्कृष्टतेवर आपला भर असायला हवा.  छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे., असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाindia china faceoffभारत-चीन तणावDemonetisationनिश्चलनीकरणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी