शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Crisis: “मी तेव्हाच सांगितलं होतं की भारताने तालिबानशी...”; ओवेसींचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 08:52 IST

एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले असून, सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे.

ठळक मुद्देअसदुद्दीन ओवेसी यांचे केंद्र सरकावर टीकास्त्र सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची करून दिली आठवणअफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही

नवी दिल्ली:तालिबाननेअफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवला असून, आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबानने एकेक करून अफगाणिस्तानचा पूर्ण ताबा मिळवला. या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील नेत्यांनीही यावर मते मांडण्यास सुरुवात केली असून, काहींनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकावर टीकास्त्र सोडले असून, सन २०१३ मध्ये संसदेत केलेल्या एका भाषणाची आठवण करून दिली आहे. (aimim asaduddin owaisi criticised centre government over taliban afghanistan crisis)

अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?

सन २०१३ मध्ये असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत केलेल्या एका भाषणादरम्यान भारताने तालिबानशी संवाद कायम ठेवायला हवा. या चर्चेच्या माध्यमातून राजकीय हितांचे संरक्षण करायला हवे, असे म्हटले आहे. अफगाणिस्तान आणि तालिबान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी तेव्हाच सांगितले होते की, अफगाणिस्तानातील आपल्या हितांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तालिबानशी राजकीय स्तरावर संवाद सुरू केला पाहिजे. भारताने अफगाणिस्तानात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली होती. कोणत्याही सरकारने या बाजूकडे लक्ष दिलेले नाही. आता यावर भारत सरकार काय करणार, अशी विचारणा ओवेसी यांनी केली आहे. 

तालिबानचा धोका, अपहरणाची भीती अन् संपत आलेले इंधन; Air India च्या विमानाचा १ तास थरार

तालिबानच्या हालचालींवर चिंता केली होती व्यक्त

सन २०१९ मध्ये अफगाणिस्तानातील तालिबानच्या हालचालींवरून चिंता व्यक्त केली होती. संसदेत यासंदर्भातील गोष्टींचा पुनरुच्चार केला होता. पाकिस्तान, अमेरिका आणि तालिबान यांची मॉस्को येथे एक बैठक झाली होती, तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची किती वेळा गळाभेट घेतली, हे सांगण्यात व्यस्त होता. अफगाणिस्तानसंदर्भात भारताची भूमिका काय हे अद्यापही स्पष्ट नाही, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. 

“मला कठोर निर्णय घ्यावा लागला अन् मी देश सोडला”; अशरफ घनींचे देशवासीयांना भावुक पत्र

दरम्यान, संपूर्ण ताबा मिळवल्यानंतर अफगाण सरकारने विनाशर्त शरण येऊन सत्तेचे ‘शांततापूर्ण हस्तांतर’ करावे असे आवाहन तालिबानी बंडखोरांनी केले. त्यानंतर एका व्हिडिओमध्ये तालिबानी लोक राष्ट्रपती भवनात बसलेले दिसत आहेत. तालिबानच्या एका नेत्याने बंडखोर वेगवेगळ्या प्रांतातून पुन्हा एकत्र येत आहेत आणि नवीन शासन संरचना तयार करण्यासाठी परदेशी सैन्य निघून जाण्याची वाट पाहत आहेत, असे सांगितले जात आहे. तसेच अफगाणांना दैनंदिन कामकाज पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि नागरिकांना घाबरवण्यासाठी काहीही करू नका, असे आदेश तालिबानींना देण्यात आले आहेत. 

टॅग्स :PoliticsराजकारणAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीCentral Governmentकेंद्र सरकारprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनParliamentसंसद