शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

"कृषी विधेयक शेतकऱ्यांना तर कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:13 PM

NCP Sunil Tatkare News: सुनील तटकरे यांचे प्रतिपादन । दहिवली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची सभा, कर्जतमधील विकासकामांवर भर

कर्जत : ‘केंद्र सरकारने देशात कृषी विधेयक आणले आहे. ते शेतकऱ्यांना तर नवीन कामगार कायदा कामगारांना देशोधडीला लावेल. त्यासाठी आपण सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोना महामारीमध्ये पक्ष संघटनेत मरगळ आली होती. आता आजपासून पक्ष संघटनेकडे लक्ष देण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांनी येथे केले.

कर्जत दहिवली येथील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या पुढील वाटचालीची दिशा काय असेल? यासाठी कार्यकर्त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, महिला जिल्हा उपाध्यक्ष गीता पारलेचा, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, कृषी सभापती बबन मनवे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, शरद लाड, जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आदी उपस्थित होते.

कोरोनामुळे अनेक सहकारी आपल्याला सोडून गेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षित कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे. निवडणुकीनंतर आपण सत्तेत येऊ असे वाटले नव्हते; परंतु शरद पवारांमुळे ते शक्य झाले. कर्जत हा आधी काँग्रेसचा आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. तो आपल्या सर्वांच्या सहकायार्मुळे तसाच राहील. कर्जत तालुक्यातील विकासकामे पूर्वीसारखीच होतील. कर्जत - पनवेल रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील,’ असे प्रतिपादन सुनील तटकरे यांनी केले.अदिती तटकरे यांनी, ‘पूर्वीपासूनच या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघाच्या बरोबरीने नव्हेतर, त्यापेक्षा जास्तच विकासकामे केली आहेत. त्याप्रमाणेच आताही काकणभर जास्तच कामे या मतदारसंघात होतील,’ असे सांगितले.नवीन कार्यकर्त्यांना संधीसुरेश लाड यांनी तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेताना, ‘नेरळमध्ये आता टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे तेथील ग्रामसेवकाच्या आवाक्याबाहेर कामाचा व्याप आहे. तेथे नगरपालिका होणे गरजेचे आहे. कोंढाणा धरणही होणे आवश्यक आहे. तेसुद्धा कर्जतकरांसाठी. कारण भविष्यात पाण्यावरील वीजनिर्मिती बंद झाली तर आम्हाला पाण्यासाठी वणवण करावी लागेल. पक्ष संघटना बांधताना येथील पदाधिकाºयांनी आम्हाला आता बाजूला करा. नवीन कार्यकर्त्यांना संधी द्या, असे जरी सांगितले असले तरी या परिस्थितीत सध्या तरी बदल होणार नाही; मात्र सर्वांच्या विचाराने सारे काही व्यवस्थित होईल,’ असे सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsunil tatkareसुनील तटकरेCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीagricultureशेती