शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:59 IST

पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची संख्या पुरेशी नसल्याने उपचार क रण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार रुग्ण आणि डॉक्टरांकडूनही होऊ लागली आहे. शिवाय डॉक्टरांवर कामाचा ताणही पडत आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर संत तुकारामनगर येथे सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयात शहरातीलच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेडसह सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद अशा विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. विविध अपघातांमध्ये गंभीर जखमींना वायसीएमधील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. हा लौैकिक ऐकून उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महापालिकेकडून येथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांची संख्या वाढवली जात नाही.महापालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर मानधनावर तर परिचारिका, वॉर्ड बॉय, टेक्निशियन यांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीक विभागात आणले असता पुरेशे डॉक्टर नाहीत. यामुळे रुग्णांची हेळसांड होते.>शल्यचिकित्सकांची संख्या अपुरी असल्याने अनेक रुग्णांच्याशस्त्रक्रिया रखडलेल्या असतात. भुलतज्ज्ञांच्याही जागा रिक्त आहेत. आंतररुग्ण विभागात हजारो रुग्ण भरती केले जातात. या रुग्णांच्या शुश्रूषेसाठी आवश्यक असणाºया परिचारिक ा, वॉर्ड बॉय यांचीही संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.७५० खाटांच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५० रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयासाठी ७३ वैैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र यापैैकी केवळ ३७ जागांवरच नियुक्त्या केल्या आहेत. रुग्णालयासाठी सुमारे ९५० लोकांचा स्टाफ असून त्यामध्ये ५९० कायम कर्मचारी, तर ४०९ कंत्राटी तसेच मानधनावर काम करत आहेत.सुरक्षा अन् सुविधांचा अभावरुग्णालयातील डॉक्टरांची अपुरी संख्या येथील उपलब्ध डॉक्टरांसाठी अधिक डोकेदुखी ठरत आहे. एखादा गंभीर इजा झालेला रुग्ण उपचारासाठी आणला असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाच्या तपासणीसाठी बिलंब लागतो. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून गोंधळ घातला जातो. तोडफोड केली जाते. प्रसंगी डॉक्टरांना मारहाणही केली जाते. याच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ‘मार्ड’ने संप केला होता. सुरक्षा अन् सुविधांची येथे वानवा आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.महाविद्यालयाचा घाटडॉक्टर अन् रुग्णांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास अद्याप महापालिकेला मुहूर्त सापडत नाही. मात्र, पालिका प्रशासनाने ‘वायसीएम’मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा घाट घातला आहे. रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे असताना महाविद्यालयाचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय महाविद्यालयासाठी डॉक्टरांच्या जागा भरण्यास पालिकेला परवडते. मग, यापूर्वी अपुºया डॉक्टरसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होताना प्रशासनाने डॉक्टरांची भरती का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.>बालरोगतज्ज्ञांची वानवाबाह्यरुग्ण विभागात दररोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. यातील बहुतांश रुग्ण मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. सुमारे पाचशे रुग्ण तपासण्यासाठी मेडिसीन विभागात येतात. मात्र या विभागातील डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण येत असून त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन यांची संख्याही अपुरी आहे.