शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

‘वायसीएम’ डॉक्टरांविना सलाइनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:59 IST

पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएम) अपु-या मनुष्यबळाची समस्या भेडसावत आहे.तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. डॉक्टरांची संख्या पुरेशी नसल्याने उपचार क रण्यासाठी विलंब होत असल्याची तक्रार रुग्ण आणि डॉक्टरांकडूनही होऊ लागली आहे. शिवाय डॉक्टरांवर कामाचा ताणही पडत आहे.शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या धर्तीवर संत तुकारामनगर येथे सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची स्थापना केली. या रुग्णालयात शहरातीलच नव्हे तर आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेडसह सोलापूर, बार्शी, उस्मानाबाद अशा विविध भागांतील रुग्ण उपचारासाठी येत असतात. विविध अपघातांमध्ये गंभीर जखमींना वायसीएमधील डॉक्टरांनी जीवदान दिले आहे. हा लौैकिक ऐकून उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, महापालिकेकडून येथील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांची संख्या वाढवली जात नाही.महापालिकेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेल्या रुग्णालयातील बहुतांश डॉक्टर मानधनावर तर परिचारिका, वॉर्ड बॉय, टेक्निशियन यांसह अन्य कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. अपघातातील गंभीर रुग्णांना तातडीक विभागात आणले असता पुरेशे डॉक्टर नाहीत. यामुळे रुग्णांची हेळसांड होते.>शल्यचिकित्सकांची संख्या अपुरी असल्याने अनेक रुग्णांच्याशस्त्रक्रिया रखडलेल्या असतात. भुलतज्ज्ञांच्याही जागा रिक्त आहेत. आंतररुग्ण विभागात हजारो रुग्ण भरती केले जातात. या रुग्णांच्या शुश्रूषेसाठी आवश्यक असणाºया परिचारिक ा, वॉर्ड बॉय यांचीही संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.७५० खाटांच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात ५० रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णालयासाठी ७३ वैैद्यकीय अधिकाºयांची आवश्यकता आहे. मात्र यापैैकी केवळ ३७ जागांवरच नियुक्त्या केल्या आहेत. रुग्णालयासाठी सुमारे ९५० लोकांचा स्टाफ असून त्यामध्ये ५९० कायम कर्मचारी, तर ४०९ कंत्राटी तसेच मानधनावर काम करत आहेत.सुरक्षा अन् सुविधांचा अभावरुग्णालयातील डॉक्टरांची अपुरी संख्या येथील उपलब्ध डॉक्टरांसाठी अधिक डोकेदुखी ठरत आहे. एखादा गंभीर इजा झालेला रुग्ण उपचारासाठी आणला असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्या रुग्णाच्या तपासणीसाठी बिलंब लागतो. अशा वेळी रुग्णाच्या नातेवाइकांकडून गोंधळ घातला जातो. तोडफोड केली जाते. प्रसंगी डॉक्टरांना मारहाणही केली जाते. याच कारणांमुळे काही महिन्यांपूर्वी ‘मार्ड’ने संप केला होता. सुरक्षा अन् सुविधांची येथे वानवा आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.महाविद्यालयाचा घाटडॉक्टर अन् रुग्णांकडून वारंवार तक्रारी होत असतानाही डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यास अद्याप महापालिकेला मुहूर्त सापडत नाही. मात्र, पालिका प्रशासनाने ‘वायसीएम’मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा घाट घातला आहे. रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा करणे गरजेचे असताना महाविद्यालयाचा हट्ट कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय महाविद्यालयासाठी डॉक्टरांच्या जागा भरण्यास पालिकेला परवडते. मग, यापूर्वी अपुºया डॉक्टरसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होताना प्रशासनाने डॉक्टरांची भरती का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.>बालरोगतज्ज्ञांची वानवाबाह्यरुग्ण विभागात दररोज हजारोंच्या संख्येने उपचारासाठी रुग्ण येत असतात. यातील बहुतांश रुग्ण मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. सुमारे पाचशे रुग्ण तपासण्यासाठी मेडिसीन विभागात येतात. मात्र या विभागातील डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे डॉक्टरांवर ताण येत असून त्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे. बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन यांची संख्याही अपुरी आहे.