शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
4
Viral Video : प्रवेशद्वारावरील मेटल डिटेक्टरला घंटा समजू लागले लोक; एकाने हात लावल्यावर पुढे काय झाले बघाच!
5
फोडाफोडीचं कारण, पक्षामध्ये खदखद! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत, अमित शाहांची घेणार भेट
6
स्पेशल 26! बंगळुरूमध्ये भरदिवसा लूट; छाप्याच्या नावाखाली तब्बल ७.११ कोटींवर मारला डल्ला
7
“महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा”: काँग्रेस
8
'धुरंधर' चित्रपटाचा ट्रेलर पाहून ध्रुव राठी संतापला; थेट ISIS शी केली तुलना, म्हणाला...
9
'ऑपरेशन सिंदूर'ने पाकिस्तानला दिलाय मोठा दणका; ६ महिन्यांनंतरही 'नूर खान एअरबेस' पूर्ववत होईना!
10
पाकिस्तानमुळे मोठे आर्थिक नुकसान, आम्हाला चीन..; एअर इंडियाची केंद्र सरकारकडे 'ही' मागणी
11
'मिसेस देशपांडे'मध्ये दिसणार माधुरी दीक्षित, केली नव्या सीरिजची घोषणा; सोबत मराठी अभिनेता
12
सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
13
काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट...
14
जैश-ए-मोहम्मदची परिस्थिती बिघडली, दहशतवाद्यांना थंडीपासून वाचवण्यासाठी पैसे मागण्याची आली वेळ
15
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
16
₹३८ च्या शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला ५८८४% परतावा! काय आहे कंपनीचा व्यवसाय?
17
स्मार्टफोनची बॅटरी धडाधड उतरतेय? पटकन ऑन करा 'या' ५ सेटिंग्स; बॅटरीची होईल दुप्पट बचत
18
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
19
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
20
U19 World Cup 2026 Schedule : ICC चा मोठा निर्णय; वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या गटातून पाकिस्तान बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्तीने मागितला जातोय राजीनामा, ‘आयटी’ संकटात; ३० ते ४५ वर्षे वयोगटातील कर्मचारी असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:54 IST

आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे

पिंपरी : नोकरी जाण्याची सततची भीती, मध्यमवयीन कर्मचाऱ्यांवरील वाढता दबाव, सरकारी संरक्षणाचा अभाव आणि संशोधन-नवकल्पनांवरील अपुरी तजवीज या प्रमुख आव्हानांचा सामना करणारे ‘आयटी’ क्षेत्र सध्या संकटात असल्याचे चित्र आहे. पुण्यालगतच्या हिंजवडी परिसरातील आयटीयन्स सध्या या ताणतणावांना सामोरे जात आहेत.

आयटी कंपन्यांमध्ये ‘प्रकल्प संपला की कर्मचारी बाहेर’ अशी परिस्थिती आहे. प्रोजेक्टआधारित भरती आणि तातडीची कर्मचारी कपात यामुळे हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य अधांतरी असल्याचे चित्र समोर आले आहे. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या जागी कमी पगारातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याने ३० ते ४५ वर्षे वयोगट सर्वाधिक असुरक्षित ठरत आहे. अनेकांना सक्तीने राजीनामा द्यावा लागतो, तर काही जणांना नव्या नोकरीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत आहे.

कर्मचारी कपातीदरम्यान पारदर्शकता, नोकरी संपल्याची भरपाई आणि बेरोजगारी भत्ता अशा संरक्षणात्मक व्यवस्थांचा अभाव असल्याने आयटी कर्मचाऱ्यांना कोणताही आधार मिळत नाही. काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमी तपासणीबाबत (बीजीव्ही) भीती दाखविली जात आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याची खंत आयटीयन्सकडून व्यक्त करण्यात आली.

सद्य:परिस्थितीत बहुतांश आयटी कंपन्या आउटसोर्सिंग, कॉस्ट कटिंग आणि शॉर्ट-टर्म बिलिंग मॉडेलवर चालत असल्याने एआय, सायबर सिक्युरिटी, सेमीकंडक्टर व रोबोटिक्ससारख्या क्षेत्रात मागे पडत आहेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मजबूत कामगार संरक्षण कायदे, देशव्यापी कौशल्यवृद्धी मोहीम, संशोधन-नवकल्पनांना मोठा निधी आणि मध्यमवयीन कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या करिअरच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे मतही आयटीयन्सकडून व्यक्त केले जात आहे.

देशातील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीने महिला कर्मचाऱ्याच्या एकाकीपणाचा फायदा घेतला. तिला प्रसूतीरजेनंतर जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले. कंपनीचे हे कृत्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे आणि मातृत्वाच्या हक्कांचे उल्लंघन करणारे आहे. - एक आयटीयन्स.

देशातील विविध कामगार कायद्यातील तरतुदी आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही लागू आहेत. आयटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांनी आमच्या कार्यालयात रीतसर दाद मागावी. कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. - निखिल वाळके, कामगार उपायुक्त

आयटी क्षेत्रातील कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. परंतु, आयटी कंपन्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक वेठबिगारासारखी आहे. अलीकडच्या काळात आयटी कर्मचाऱ्यांकडून जबरदस्तीने राजीनामा देण्यास भाग पाडले जात आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रशांत पंडित, सचिव, फोरम फाॅर आयटी एम्प्लाॅइज

टॅग्स :PuneपुणेhinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीMONEYपैसाSocialसामाजिकUnemploymentबेरोजगारी