शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

Pimpri Chinchwad: मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर; नदीकाठच्या भागात शिरतंय पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:30 IST

पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर ८ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर ५ ठिकाणी पाणी घुसत आहे

पिंपरी : औद्योगिक नगरीतून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची नैसर्गिक पात्र शहरीकरण वाढल्याने आणि भराव टाकल्याने अरुंद झाली आहेत. त्यामुळे पूर आल्यानंतर शहरातील पवना नदी तीरावर ११ ठिकाणी, मुळा नदीवर आठ ठिकाणी आणि इंद्रायणी नदीवर पाच ठिकाणी पाणी घुसत आहे. मानवाच्या चुकांमुळे, चुकीच्या धोरणांमुळे शहराला पूर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

पिंपरी - चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी अशा तीन नद्या वाहतात. त्यापैकी सर्वांत जास्त २४.४ किलोमीटर लांबीची पवना नदी शहराच्या मध्य भागातून वाहते. या नदीकाठच्या भागांमध्ये किवळेपासून ते दापोडीपर्यंत तसेच मुळा नदीवर वाकडपासून सांगवी, बोपखेलपर्यंत आणि इंद्रायणी नदीवर तळवडेपासून तर चऱ्होलीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नदीचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे पाऊस कमी पडला तरी या भागातील नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरते. त्यामुळे नागरिकांना पूर परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे.

...ही आहेत पूर येण्याची ठिकाणे

पवना नदीवर किवळे, जाधव घाट रावेत, ताथवडे, चिंचवड केशवनगर, काळेवाडी, पिंपरी भाटनगर, संजय गांधीनगर, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, लक्ष्मीनगर येथे पुराचे पाणी शिरण्याचा धोका अधिक आहे. तसेच मुळा नदीवर वाकड, कस्पटे वस्ती, पिंपळे निलख पंचशीलनगर, सांगवी, मुळानगर, दापोडी, बोपखेल या भागात पुराचे पाणी शिरते. इंद्रायणी नदीवर चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या भागात पाणी शिरते.

नद्यांमधील भरावाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

पिंपरी आणि चिंचवडच्या सखल भागात नदीकाठी वस्ती ही अनेक वर्षांपासून आहे. त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. पवना नदीच्या परिसरामध्ये रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, दापोडी या भागांमध्ये नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भराव टाकून पात्र बुजवले आहे. त्या भरावाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.

नद्यांच्या परिसरामध्ये वृक्षतोड केली जात आहे आणि नदी सुधारचा घाट घातला जात आहे. नद्यांची नैसर्गिकता कायम ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नद्यांमध्ये टाकलेल्या भरावांमुळे आता पूर परिस्थिती निर्माण होत आहे. ती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. नद्यांचे पात्र अरुंद होणार नाही आणि वृक्षतोड होणार नाही, जैवविविधता नष्ट होणार नाही, याकडे लक्ष द्यायला हवे. - नीलेश पिंगळे, पर्यावरणवादी

पंचवीस वर्षात शहराचे नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नदीकाठच्या सखल भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पूर्वी मोकळ्या वाटणाऱ्या नद्या आता इमारती व घरे वाढल्याने अरुंद झाल्या आहेत. यासाठी वैज्ञानिक विचार करून नद्यांचे पुनरुज्जीवन करायला हवे, नद्यांमधील साचलेला गाळ काढायला हवा.- प्रशांत शितोळे, माजी स्थायी समिती सभापती

संजयनगर परिसरामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहोत. जोरदार पाऊस झाल्यानंतर सखल भागामध्ये आमच्या घरांमध्ये पाणी घुसते. त्यामुळे नुकसान होते. यासंदर्भात प्रशासन, लोकप्रतिनिधींनी कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा.- भरत पगारे, पिंपरी

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसpavana nagarपवनानगरindrayaniइंद्रायणीriverनदीMuncipal Corporationनगर पालिकाmula muthaमुळा मुठा