शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

इंद्रायणी स्वच्छतेसाठी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 02:09 IST

इंद्रायणी नदीवरील चिखली येथील सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)च्या अधिकृततेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती.

पिंपरी : इंद्रायणी नदीवरील चिखली येथील सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प (एसटीपी)च्या अधिकृततेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली होती. चिखलीतील एसटीपी प्रकल्प अधिकृतच असल्याचे पुरावे महापालिकेने दिले असून, इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प केला जाणार आहे, अशी भूमिका महापौर राहुल जाधव यांनी घेतली आहे.महापालिका क्षेत्रात पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या आहेत. महापालिकेच्या वतीने सांडपाणी पुनरप्रक्रिया प्रकल्प राबविले जातात. मात्र, ही यंत्रणा सक्षम नसल्याने तीस टक्के पाणी नदीत प्रक्रियेविनाच सोडले जाते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने एसटीपी आरक्षणे विकसित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार चिखलीतील आरक्षण विकसित केले आहे. महापालिकेत १९९७ मध्ये काही गावांचा समावेश झाला. त्यानंतर २००८ मध्ये या गावांचा नव्याने आराखडा तयार केला. त्यानुसार २०१५ ला आरक्षण ताब्यात घेतले आहे. त्यानंतर यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानुसार काम सुरू झाले आहे. चिखलीतील या एसटीपीला राष्टÑवादी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. विरोधीपक्षनेते दत्ता साने यांनी एसटीपीचे काम अनधिकृत आहे़ हे काम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी ‘एसटीपी उभारायचे नाही, तर शहराची गटारगंगा करायची का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर आज महापौर राहुल जाधव यांनी या प्रकल्पाचे पुरावे देऊन एसटीपी हा अधिकृत आहे, हे सांगितले व नदी स्वच्छतेसाठी एसटीपी आवश्यक आहे.बिल्डरने केली फसवणूकमहापौर म्हणाले, ‘‘नद्याचे प्रदूषण ही वाढती समस्या आहे़ त्यामुळे नदी सुधार प्रकल्प राबविण्याबरोबरच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. तेथील नागरिकांची फसवणूक महापालिकेने केली नाही तर बांधकाम व्यावसायिकांनी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकांना जाब विचारावा.’’ तसेच नदी स्वच्छ ठेवणे हे प्रमुख आव्हान असून, महापालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या परिसरातएसटीपी प्रकल्प व्हायलाच हवा, अशी भूमिका शिवसेना, मनसेच्या गटनेत्यांनी घेतली आहे.>एसटीपी प्रकल्पचिखलीतील आरक्षण - २००८आरक्षण ताब्यात आले- २०१५एसटीपीचे क्षेत्र- १२ एकरएसटीपीक्षमता- १२एमएलडी निविदा रक्कम- ९.९० कोटीकामाची मुदत- मार्च २०२०>नद्या प्रदूषित होताहेत म्हणून बोंब मारायची. कोणत्याही गोष्टींना विरोध करणे विरोधीपक्षाचे कामच आहे. इंद्रायणी नदी स्वच्छ राहावी, म्हणून एसटीपी आवश्यकच आहे. ज्या ठिकाणी आरक्षण होते. त्याच ठिकाणी होत आहे. महापालिका कोणतेही अनधिकृत बांधकाम करीत नाही. त्यामुळे इंद्रायणीचे हीत म्हणून एसटीपी व्हावी. कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही करणारच आहे.- राहुल जाधव, महापौर>महापालिका क्षेत्रातील नद्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नद्यांमध्ये सोडण्याचे प्रमुख आव्हान महापालिकेसमोर आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे महापालिकेची जबाबदारी आहे. नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपीची सर्व आरक्षणे विकसित करायला हवीत. आरक्षण विकसित करताना शेतकऱ्यांचे मतही विचारात घ्यावे. शंभर टक्के सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडावे.- राहुल कलाटे, गटनेते शिवसेना>शहरातून तीन प्रमुख नद्या वाहतात. मात्र, नागरीकरण वाढल्याने तसेच औद्योगिक परिसर वाढल्याने रसायनयुक्त पाणी नद्यांमध्ये प्रक्रियाविनाच सोडले जाते. सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी प्रक्रिया करूनच सोडणे गरजेचे आहे. त्यासाठी एसटीपींची असणारी आरक्षणे विकसित करायला हवीत. तसेच रसायनयुक्त पाणी थेट नदीत सोडणाºया कंपन्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. त्यातून नद्याचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.- सचिन चिखले, गटनेते मनसे