शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:33 IST

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील, त्याला योग्यरित्या प्राधान्य द्या

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक उपचारक्षम आजार आहे. तो झाला म्हणून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित उपचार करून घ्या, बरे व्हाल असे आशादायी आवाहन या आजारातून २०१९ मध्येच उपचार घेऊन बरे झालेल्या नीलेश अभंग यांनी केले. अभंग हे तब्बल साडेचार महिने या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल होते.

‘लोकमत’ने अभंग यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे.

फिजिओथेरपी आवश्यक

हात, पाय किंवा दोन्ही पॅरालाइज झालेले रुग्ण वेळीच योग्य उपचार घेतल्यास लवकर बरे होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांनी फिजिओथेरपीला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फिजिओथेरपीसाठी नियमितपणा महत्त्वाचा

पॅरालाइज झालेले अवयव दुरुस्त करायचे असतील, तर फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. फिजिओथेरपीच्या नियमित उपचारांमुळे शरीरातील अवयव पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नियमितपणे चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली उपचार घ्यायला हवे. चालढकल किंवा आळस केल्यास शरीराचा तो भाग कडक होऊ शकतो, आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची

रुग्णांच्या नातेवाईकांनी या काळात त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्ण फिजिओथेरपीसाठी पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून असतो. त्यांना फिजिओथेरपीच्या क्लिनिकमध्ये ने-आण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मात्र, हा वेळ आणि मेहनत वाया जाणार नाही, कारण सुरुवातीच्या काळात शरीर वेगाने प्रतिसाद देते.

डॉक्टरांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील. पण त्यांचे हे शब्द हलक्यात घेऊ नका. जर कायमचे अपंगत्व टाळायचे असेल, तर सुरुवातीच्या काळात फिजिओथेरपीला प्राधान्य द्या. वेळ न घालवता योग्य उपचार घ्या, अन्यथा उशीर झाल्यास त्याचा दिलासा मिळत नाही.

अपंगत्व टाळण्यासाठी तत्काळ पावले उचला

शरीर ताजेतवाने असताना, स्नायूंमध्ये ताकद असते, आणि लवकर सुधारणा होऊ शकते. पण वेळ गेल्यावर शरीर कठीण होऊ शकते आणि त्यावर उपचार निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे अडचण निर्माण होण्याआधीच उपाय करा, असे सांगत अभंग यांनी जीबीएस रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

हातांना किंवा पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यास अडचण होणे ही काही लक्षणे दिसून येतात. पण योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. - डॉ. श्रद्धा मोरे, सहायक प्राध्यापक, केईएम रुग्णालय, मुंबई

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक