शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

घाबरू नका, व्यवस्थित उपचार घ्याल, तर बरे व्हाल! 'जीबीएस' वर मात करून बरे झालेल्या तरुणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:33 IST

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील, त्याला योग्यरित्या प्राधान्य द्या

पुणे: गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक उपचारक्षम आजार आहे. तो झाला म्हणून घाबरून जाऊ नका, व्यवस्थित उपचार करून घ्या, बरे व्हाल असे आशादायी आवाहन या आजारातून २०१९ मध्येच उपचार घेऊन बरे झालेल्या नीलेश अभंग यांनी केले. अभंग हे तब्बल साडेचार महिने या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल होते.

‘लोकमत’ने अभंग यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी या आजाराची कथा सांगितली. ते म्हणाले, हा काही आता नव्यानेच सुरू झालेला आजार नाही. मला तो १९ जानेवारी २०१९ मध्ये झाला होता. त्याच दिवशी पहाटे मला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. तिथून ३० मे २०१९ रोजी मी व्हेंटिलेटरवरून बाहेर आलो. तब्बल साडेचार महिने आयसीयूमध्ये काढले. मानेपासून पायाच्या तळव्यापर्यंत सगळं शरीर पॅरालाइज झालं होतं. फुप्फुसंही पूर्णपणे कमकुवत झाली होती, म्हणूनच व्हेंटिलेटरची गरज पडली. पण आता मी पूर्णपणे ठणठणीत झालो आहे. जे पॅरालाइज झालं होतं, ते फिजिओथेरपीमुळे पूर्वीसारखं झालं आहे.

फिजिओथेरपी आवश्यक

हात, पाय किंवा दोन्ही पॅरालाइज झालेले रुग्ण वेळीच योग्य उपचार घेतल्यास लवकर बरे होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांनी फिजिओथेरपीला प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

फिजिओथेरपीसाठी नियमितपणा महत्त्वाचा

पॅरालाइज झालेले अवयव दुरुस्त करायचे असतील, तर फिजिओथेरपी हा एकमेव उपाय आहे. फिजिओथेरपीच्या नियमित उपचारांमुळे शरीरातील अवयव पुन्हा पूर्ववत होऊ शकतात. मात्र, यासाठी रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी नियमितपणे चांगल्या फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली उपचार घ्यायला हवे. चालढकल किंवा आळस केल्यास शरीराचा तो भाग कडक होऊ शकतो, आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची

रुग्णांच्या नातेवाईकांनी या काळात त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. रुग्ण फिजिओथेरपीसाठी पूर्णपणे नातेवाईकांवर अवलंबून असतो. त्यांना फिजिओथेरपीच्या क्लिनिकमध्ये ने-आण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. मात्र, हा वेळ आणि मेहनत वाया जाणार नाही, कारण सुरुवातीच्या काळात शरीर वेगाने प्रतिसाद देते.

डॉक्टरांच्या सल्ल्याला गांभीर्याने घ्या

डॉक्टर डिस्चार्जच्या वेळी फक्त घरी जाऊन फिजिओथेरपी करा, असे सांगतील. पण त्यांचे हे शब्द हलक्यात घेऊ नका. जर कायमचे अपंगत्व टाळायचे असेल, तर सुरुवातीच्या काळात फिजिओथेरपीला प्राधान्य द्या. वेळ न घालवता योग्य उपचार घ्या, अन्यथा उशीर झाल्यास त्याचा दिलासा मिळत नाही.

अपंगत्व टाळण्यासाठी तत्काळ पावले उचला

शरीर ताजेतवाने असताना, स्नायूंमध्ये ताकद असते, आणि लवकर सुधारणा होऊ शकते. पण वेळ गेल्यावर शरीर कठीण होऊ शकते आणि त्यावर उपचार निष्फळ ठरू शकतात. त्यामुळे अडचण निर्माण होण्याआधीच उपाय करा, असे सांगत अभंग यांनी जीबीएस रुग्णांना सकारात्मक राहण्याचा सल्ला दिला.

हातांना किंवा पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे, श्वास घेण्यास अडचण होणे ही काही लक्षणे दिसून येतात. पण योग्य उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. - डॉ. श्रद्धा मोरे, सहायक प्राध्यापक, केईएम रुग्णालय, मुंबई

 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलSocialसामाजिक