शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांमध्ये लवकरच डिजिटल लायब्ररी

By admin | Updated: June 15, 2016 05:05 IST

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम

शाळा सुरू होताच शालेय साहित्य मिळत नसल्याची ओरड होते. यासह महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गळती, गुणवत्ता वाढीचे प्रयत्न, शालाबाह्य मुलांसाठी शिक्षण मंडळाचे उपक्रम, शिक्षक व मुख्याध्यापकांची रखडलेली पदोन्नती व शिक्षकांच्या बदल्यांमध्ये येणाऱ्या अडचणीचा प्रशासनाला कशा प्रकारे सामना करावा लागतो. या अनुषंगाने शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. सी. कारेकर यांची घेतलेली मुलाखत. यंदा १५ जूनला पहिल्याच दिवशी मुलांना वेळेत शालेय साहित्य मिळविण्यासाठी काय प्रयत्न केले गेले. यंदा मुलांना सर्व शालेय वस्तू पहिल्याच दिवशी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सर्व साहित्याचे एका शाळेतून इतर शाळांमध्ये प्राथमिक स्वरूपात वाटप होणार आहे. त्या दृष्टीने पिंपळे गुरव महापालिका शाळेत शालेय साहित्य वाटपाचे नियोजन केले आहे. शालाबाह्य मुले समाविष्ट करण्यासाठी शाळा पातळीवर काय प्रयत्न केले गेले आहेत?शाळा पातळीवर शाळाबाह्य मुलांसाठी एप्रिल महिन्यातच सर्वेक्षण झाले. त्यासाठी समिती नेमण्यात आली होती. सुट्टीच्या कालावधीतही हे काम सुरू असल्यामुळे या वर्षी शालाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ झाली आहे. पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष कोणते प्रयत्न करण्यात आले?शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी ७ मेपूर्वीच प्रवेश सुरू केले होते. त्यामुळे शाळा प्रवेश ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. नक्कीच यंदा पटसंख्येत वाढ होईल. तसेच शाळास्तरावर विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा ओढा निर्माण होईल. यंदाच्या वर्षी नवनवीन कोणत्या संकल्पना हाती घेतल्या आहेत? महापालिकेच्या ५० शाळांमध्ये डिजिटल लायब्ररी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारी एक संस्था विनामोबदला सहकार्य करीत आहे. त्याचप्रकारे स्वतंत्र बालवाडी अभ्यासक्रम तयार केला आहे. प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा भरविल्या आहेत. रोटरी क्लबमार्फत विद्यार्थ्यांना सायबर क्राईमचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळा स्तरांवर सीडीचे वाटप ३० जूनपर्यंत केले जाणार आहे. त्याचप्रकारे ज्या शाळांचे शिक्षक बारावी सायन्स झाले आहेत, त्या शाळांमध्ये पहिलीपासूनच सेमी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पूर्वी फक्त ठरावीक शाळांमध्ये सेमी वर्ग होते. गुणवत्ता वाढीसाठी विशेष कोणते उपक्रम राबविले जाणार आहेत. गुणवत्तावाढीसाठी हस्ताक्षरलेखन उपक्रम सुरू च आहे. त्याचप्रकारे विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्याचप्रकारे मुलांच्या बुद्धिमत्तावाढीसाठी इंग्रजी विषयावर भर दिला जाणार आहे. पाढे पाठांतराचा उपक्रमही सुरू आहे. ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांना या वर्षापासून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.