शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन; स्वच्छतेत अव्वल ठरलेल्या 41 गृहनिर्माण संस्था, 15 शाळांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 09:48 PM2017-10-02T21:48:13+5:302017-10-02T21:54:42+5:30

मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत गांधी जयंतीच्या निमित्ताने सोमवारी शहरात स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पालिकेने स्वच्छतेसाठी निश्चित केलेल्या तारांकित मानांकनानुसार एकूण ४१ गृहनिर्माण संस्थांसह १५ शाळांची निवड करण्यात आली.

रॅलीला पालिकेच्या सहा प्रभागांतर्गत सुरुवात करण्यात आली. त्यात नागरिकांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचतगटाचे सदस्य, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

रॅलीद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्यात येऊन ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासह ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचे तसेच उघड्यावर शौचाला न बसणे व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी दर आठवड्यातून २ तास तर वर्षभरात १०० तास श्रमदान करण्याचा संकल्प केला.