केळीच्या पानात जेवण का फायद्याचं असतं, ५ कारणं-म्हणून पारंपरिक पंगतीत केळीच्या पानावर वाढतात पदार्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:54 IST2026-01-14T16:54:11+5:302026-01-14T17:54:52+5:30
Eating on banana leaves Benefits :

भारतीय संस्कृतीमध्य केळीच्या पनावर जेवणं ही एक प्राचीन आणि आरोग्यदायी परंपरा आहे. केळीच्या पानांवर जेवल्यानं काय फायदे होतात ते समजून घ्या. (Eating on banana leaves Benefits)

केळीची पानं नैसर्गिकरित्या स्वच्छ असतात. त्यावर अन्नावर परिणाम करणारे कोणतेही रासायनिक घटक किंवा जंतू नसतात. त्यामुळे ते प्लास्टीक किंवा इतर भांड्यांपेक्षा जास्त सुरक्षित मानले जातात.

केळीच्या पानांमध्ये पॉलिफेनोल्स नावाचे नैसर्गिक एंटी ऑक्सिडंट्स असतात. जेव्हा गरम अन्न पानांवर वाढले जाते तेव्हा हे घटक अन्नात मिसळतात. जे शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात.

केळीच्या पानावर जेवल्यानं अन्नाची चव वाढतेच पण त्यातील नैसर्गिक गुणांमुळे अन्नाचे पचन सुलभ होते.

केळीची पानं नैसर्गिक आणि बायोडिग्रेडेबल असतात. जेवण झाल्यावर ती फेकून दिली तरी त्याचे सहज विघटन होते.ज्यामुळे प्रदूषणाचा धोका नसतो.

प्लास्टीक किंवा थर्माकॉलच्या पत्रावळींमध्ये गरम अन्न खाल्ल्यास रसायनं पोटात जाण्याची भिती असते. परंतू केळीच्या पानांबाबत असा कोणताही धोका नसतो.

केळीच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात जे अन्नातील सुक्ष्म जंतूंना नष्ट करण्यास मदत करतात. यामुळे अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो.

भारतीय परंपारेत केळीचे झाड हे समृद्धीचे प्रतिक मानले जाते. पानावर जेवल्यानं मनाला शांती आणि एक प्रकारची सकारात्मकता मिळते जी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते.

















