'ही' लक्षणं दिसताच शरीरातलं Vitamin B12 तातडीने वाढवायला हवं! तब्येत बिघडण्याआधीच सावध व्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 22:35 IST2025-06-02T22:27:43+5:302025-06-02T22:35:38+5:30

बहुसंख्य भारतीय लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दिसून येते. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, मेंदूचे कार्य व्यवस्थित राहण्यासाठी, डिएनए सिंथेसिस व्यवस्थित होण्यासाठी तसेच शरीरातली एनर्जी टिकून राहण्यासाठी व्हिटॅमिन बी १२ खूप गरजेचे असते.

ते जेव्हा कमी होते, तेव्हा शरीरात काही लक्षणं प्रकर्षाने दिसून येतात. ही लक्षणं दिसून येताच शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत.

ज्यांचे व्हिटॅमिन बी १२ खूप कमी असते त्यांना नेहमीच थकवा आलेला असतो. खूप अशक्तपणा जाणवतो.

व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्यानंतर शरीरातील लाल रक्तपेशीही कमी होतात. त्यामुळे चेहरा खूप निस्तेज दिसतो. शरीरात ॲनिमियाप्रमाणे लक्षणं दिसू लागतात.

सतत डोकेदुखीचा त्रास होणे हे देखील व्हिटॅमिन बी १२ कमी झाल्याचे एक लक्षण आहे.

व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मूड स्विंग, डिप्रेशन, एन्झायटी असा त्रास होतो.

स्नायूंना थकवा येणे, हातापायाला वारंवार मुंग्या येणे, हातपाय मधूनच थंड पडणे ही देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता सांगणारी लक्षणं आहेत.