५ लक्षणं सांगतात किडनीचं आरोग्य बिघडू लागलंय! वेळेत ‘हे’ बदल वाचवतील किडनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 20:22 IST2025-07-02T17:09:43+5:302025-07-02T20:22:28+5:30

किडनीचे वेगवेगळे आजार पाठीमागे लागण्याचं प्रमाण हल्ली खूप जास्त वाढत चाललं आहे. यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली..

खाण्यापिण्याच्या सवयी एवढ्या जास्त बदलून गेल्या आहेत की ते बदल आपल्या शरीराला स्वीकारणंही जड जात आहे. त्यामुळेच तर कमी वयात वेगवेगळे अवयक निकामी होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

त्यापैकी आपल्या किडनीचं आरोग्याविषयी सांगणारी ही काही लक्षणं पाहून घ्या.. पुढे सांगितलेले काही त्रास तुम्हाला वारंवार जाणवत असतील तर एकदा किडनीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला चांगला.

clevelandclinic यांनी दिलेल्या माहितीनुसार नेहमीच खूप थकवा येणे, अंगात खूप आळस असणे, नॉशिया हे काही बरं लक्षणं नाही.

किडनीचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या हातावर, पायावर आणि चेहऱ्यावर नेहमीच सूज आलेली दिसते.

लघवीला वारंवार जावं लागत असेल किंवा लघवीचा रंग नेहमीच गडद पिवळा असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचा खूप कोरडी होणे आणि वारंवार खाज येणे हा त्रासही किडन्यांचे कार्य नीट होत नसेल तर होऊ शकतो.

पायांमध्ये नेहमीच गोळे येणे, भूक न लागणे, काही खाण्याची इच्छा न होणे.. याप्रकारची लक्षणं तुमच्या किडनीच्या बिघडलेल्या आरोग्याविषयी सांगतात.

किडन्यांचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर भरपूर पाणी प्यायला हवं. तसेच आहारातील मिठाचं प्रमाण कमी करावं.

थोडंसं काही दुखलं की लगेच वारंवार स्वत:च्या मनानेच पेन किलर घेणे टाळावे. या गोळ्यांचा किडन्यांवर खूप वाईट परिणाम होतो.

मद्यपान, धुम्रपान अशा व्यसनांमुळेही किडन्यांचा त्रास वाढतो.