'पाक'चा क्रूरपणा! काश्मिरी जनतेवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 07:46 PM2018-01-19T19:46:01+5:302018-01-19T19:48:19+5:30

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे.

पाकिस्ताननं 24 तासांमध्ये दुस-यांदा गोळीबार केला आहे. जम्मूमधील आर.एस.पुरा सेक्टर, अर्निया व रामगड सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे.

दरम्यान, गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. गुरुवारीदेखील (18 जानेवारी) आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता.

पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून 30- 40 भारतीय चौक्यांना टार्गेट करण्यात येत आहे.

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतानं एकूण 3 पाकिस्तानी सैनिकांसहीत 8 जणांचा खात्मा केला आहे. यादरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश शहीद झालेत.