CoronaVirus News : तब्बल 18 वर्षांनी 'ते' गावी परतले पण ना आई जिवंत होती ना पत्नी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 11:08 AM2020-05-23T11:08:21+5:302020-05-23T11:21:56+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक लाखांवर वर पोहोचली आहे. तर 3500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध मार्गाचा वापर करून लोक आपल्या गावी जात आहेत. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे.

अचानक ओढावलेल्या या संकटामुळे कित्येक वर्षांनी काहीजण आपल्या मूळ गावी परतत आहेत. लॉकडाऊन दरम्यान अनेक हृदयद्रावक घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे.

तब्बल 18 वर्षांनंतर एक व्यक्ती मुंबईहून आपल्या गावी परतली पण तोपर्यंत कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले होते.

उत्तर प्रदेशातील कैथवलियामध्ये ही घटना घडली. महंगी प्रसाद असं या व्यक्तीचं नाव असून साधारण 18 वर्षांपूर्वी त्यांनी रागाने घर सोडलं होतं. कामाच्या शोधात ते मुंबईला गेले होते.

लॉकडाऊनमध्ये प्रसाद आपल्या गावी परतले मात्र त्यावेळी त्यांच्या आईचं आणि पत्नीचं निधन झालं होतं. कारण 18 वर्षांत खूप काही घडलं होतं. बऱ्याच गोष्टी या बदलल्या होत्या .

कैथवलिया गावचा रहिवासी असलेले महंगी प्रसाद यांचं 18 वर्षांपूर्वी पत्नीसोबत भांडण झालं. रागाच्या भरात ते घर सोडून गेले.

प्रसाद त्यावेळी अंदाजे 40 वर्षांचे होते आणि त्यांचे लग्नही झाले होते. त्यांना एक मुलगीही होती.

घरात झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून ते घर सोडून गेले आणि आता तब्बल 18 वर्षांनंतर गावात परतले. 18 वर्षांपूर्वी आई, पत्नी आणि मुलींना घरी ठेवून मुंबई गाठली.

एका छोट्या कारखान्यात ते सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करू लागले. गेल्या 18 वर्षांमध्ये गाव आणि घराची आठवण नाही आली.

गावातील लोकांनी प्रसाद यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजून त्यांची घरी परत येण्याची अपेक्षाही कुटुंबीयांनी सोडून दिली.

लॉकडाऊन जवळ असलेले पैसे संपले आणि प्रसाद यांना घरची आठवण येऊ लागली म्हणून त्यांनी आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला.

3500 रुपयांचे भाडे देऊन प्रसाद अखेर उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे पोहोचले. तिथून त्यांनी आपल्या घरापर्यंत पायी प्रवास केला. गावी त्यांना त्यांच्या मुली भेटल्या.

आपले वडील जिवंत आहेत हे समजल्यावर त्यांना खूप आनंद झाला. आता प्रसाद यांनी मुली आणि जावयासोबत उर्वरित आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.