शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने 2138 जणांचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2017 1:50 PM

1 / 7
गेल्या वर्षभरात वाहन चालवताना मोबाइलचा वापर केल्याने देशभरात २१३८ लोकांना जीव गमवावा लागल्याचे निदर्शनास आले आहे.
2 / 7
अशा अपघातांत केवळ वाहनचालकच नव्हे, तर रस्त्यांवरून चालणा-यांचाही मृत्यू झाला आहे.
3 / 7
याशिवाय चुकीच्या पद्धतीचे स्पीडब्रेकर्स, रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची अर्धवट व दर्जाहीन बांधकामे यांमुळे होणा-या अपघातांमध्ये रोज २६ लोकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.
4 / 7
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने सर्व राज्यांकडून माहिती मागवून अपघातांसंबंधीचा एक अहवाल तयार केला आहे.
5 / 7
मोबाइलचा वापर करताना झालेल्या अपघातांत उत्तर प्रदेशातील सर्वाधिक लोक मरण पावल्याचे आढळून आले. महाराष्ट्रातील १७२ जणांनीही मोबाइलवर बोलताना जीव गमावला.
6 / 7
अहवालानुसार, देशात प्रत्येक तासाला रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू होतो. वाहतूक मंत्रालयाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइलचा वापर यामागे मुख्य कारण आहे. फक्त वाहनचालकच नाही तर रस्त्यांवरुन चालणारे लोकही चालताना मोबाइलचा वापर केल्याने अपघाताला बळी पडले आहेत.
7 / 7
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे की, 'वाहन चालवताना मोबाइल फोनवर गप्पा मारणे तसंच सेल्फी घेण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे बेजबाबदार वागणा-यांच्या जिवाला धोका असतोच, मात्र ते इतरांसाठीही धोका ठरु शकतात'.
टॅग्स :AccidentअपघातMobileमोबाइलNitin Gadakriनितिन गडकरी