बोंबला! मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवरी फरार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 12:00 PM2021-03-20T12:00:04+5:302021-03-20T12:15:44+5:30

पोलिसांनुसार नूरपुर गावातील कुंडा येथील रहिवाशी चंद्रशेखरचं लग्न हरिद्वारच्या एका मुलीसोबत १५ मार्च रोजी झालं होतं. १७ मार्चच्या रात्री नवरी आणि नवरदेवाचं कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता.

उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये नव्या नवरीत आणि नवरदेवात काही कारणाने मधुंद्राच्या रात्रीच भांडण झालं. यात नवरीने नवरदेवाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. ज्यामुळे नवरदेवाला गंभीर जखम झाली आणि त्याला डॉक्टरकडे जावं लागलं.

नंतर प्रकरण पोलिसात गेलं आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. इथे नवरी-नवरदेवाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

पोलिसांनुसार नूरपुर गावातील कुंडा येथील रहिवाशी चंद्रशेखरचं लग्न हरिद्वारच्या एका मुलीसोबत १५ मार्च रोजी झालं होतं. १७ मार्चच्या रात्री नवरी आणि नवरदेवाचं कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता.

हा वाद नंतर इतका वाढला की, नवरीने नवरदेवावर लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यानंतर नवरी टॉयलेटला जात असल्याचं कारण सांगून रात्री घराच्या भींतीवरून उडी घेऊन फरार झाली.

वर पक्षाने नवरीवर घरातील दागिने आणि १५ हजार रूपये चोरी करून नेल्याचा आरोप केलाय. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि दोघांनाही पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं.

यावेळी नवरीकडच्या लोकांनी मुलांकडील लोकांवर अनेक आरोप केले. तर नवरदेवाकडील लोकांनीही त्यांच्यावर आरोप केले. तर नवरदेवावर हल्ला करून नवरी पळाली असे पोलिसांनी सांगितले.

घरात सुरू झालेला हा वाद पोलीस स्टेशनमध्येही वाढला. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप केले गेले. अशात नवरी-नवरदेवाने सोबत राहण्यास नकार दिला. पोलिसांनी दोन्ही पक्षांना प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला.

पण दोन्ही पक्षांमध्ये नवरी-नवरदेव वेगळे राहतील असं ठरलं आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी तसं लिखित दिलं. या लग्नाबाबत गावात सगळीकडे चर्चा रंगली आहे.

या घटनेबाबत मुलाच्या भावाने सांगितले की, नवरीने भावाकडे नवीन मोबाइल मागितला होता आणि सांगितले होते की, तिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध आहेत. इथे ती राहणार पण प्रियकरासोबत फोनवर बोलत राहणार. यावरूनच दोघांमध्ये मोठं भांडण झालं. यानंतर मुलगी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत पळून गेली.

Read in English