भारतात श्रीमंतांचा आकडा वाढला! 'या' देशांना टाकले मागे, तुम्हीही यादीत आहात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:08 IST2025-06-11T15:53:07+5:302025-06-11T16:08:20+5:30

Knight Frank Global Wealth Report 2025: नाईट फ्रँकच्या 'ग्लोबल वेल्थ रिपोर्ट-२०२५' नुसार, भारत आता जगातील एक महत्त्वाचे 'संपत्ती केंद्र' म्हणून उदयास आला आहे.

भारतात श्रीमंतांची संख्या तब्बल ८५,६९८ इतकी आहे. या संख्येमुळे भारत जगातील श्रीमंत लोकांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर आहे.

श्रीमंत लोकांच्या बाबतीत भारताच्या पुढे फक्त तीन देश आहेत: अमेरिका (पहिला), चीन (दुसरा) आणि जपान (तिसरा).

२०२८ पर्यंत भारतात श्रीमंत लोकांची संख्या ९३,७५८ पर्यंत वाढेल असा अंदाज नाईट फ्रँकने वर्तवला आहे, म्हणजेच ही वाढ थांबणार नाही.

२०२४ मध्ये भारतात १९१ अब्जाधीश होते, ज्यात १२% वाढ झाली. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती ९५० अब्ज डॉलर्स होती.

जगातील एकूण श्रीमंतांच्या (१ कोटी डॉलर्सपेक्षा जास्त निव्वळ संपत्ती असलेले) ३.७% लोक भारतात आहेत.

भारतात 'सर्वात श्रीमंत' लोकांच्या क्लबमध्ये (म्हणजेच पहिल्या १% श्रीमंतांमध्ये) सामील होण्यासाठी तुमच्याकडे सुमारे १.५२ कोटी रुपये (निव्वळ संपत्ती) असायला हवी.

मोनाकोमध्ये टॉप १% मध्ये येण्यासाठी १०७ कोटी रुपये, स्वित्झर्लंडमध्ये ७१ कोटी रुपये आणि अमेरिकेत ४८ कोटी रुपये लागतात. या तुलनेत भारताची मर्यादा खूप कमी आहे.

भारतातील श्रीमंत लोकांची ही वाढ तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट क्षेत्रांमुळे झाली आहे. वाढणाऱ्या स्टार्टअप्सचाही यात मोठा वाटा आहे.