शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांचे चाक मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:16 IST

परभणी : संचारबंदी काळात कंपनी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली खरी; परंतु बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा ...

परभणी : संचारबंदी काळात कंपनी सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली खरी; परंतु बाजारपेठ बंद असल्याने उत्पादन करून माल विक्री करायचा कसा? असा प्रश्‍न उद्योजकांसमोर निर्माण झाला आहे. परिणामी उद्योग व्यवसाय ठप्प पडले असून उद्योजक मोठ्या आर्थिक कचाट्यात सापडले आहेत.

संचारबंदी काळामध्ये उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी शासनाने दिली आहे. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र असून या तीनही ठिकाणी कृषीवर आधारित कंपन्यांची संख्या अधिक आहे. संचारबंदीच्या काळात या कंपन्या अल्प मनुष्यबळावर सुरू ठेवण्यात आल्या ; परंतु दुसरीकडे उत्पादित मालाची विक्री करण्यासाठी बाजारपेठ बंद असल्याने उद्योजक अडचणीत आहेत. त्यामुळे उत्पादन करून करायचे काय? असाही प्रश्न निर्माण होत आहे. दुसऱ्या बाजूला उद्योग व्यवसाय सुरू करून त्यातून निघणाऱ्या उत्पन्नातून कर्जाचे हप्ते, वीजबिल भरणा करण्याएवढेही उत्पन्न मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. कंपनी सुरू करण्यासाठी कच्चा माल, स्पेअर पार्ट आदी साहित्य उपलब्ध होत नाही. मालवाहतूक बंद असल्याने उद्योग व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार व इतर खर्चही भागविणे शक्य होत नसल्याने जिल्ह्यात उद्योग सुरू असले तरी या उद्योगांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मागील वर्षीच्या कोरोनाकाळात बसलेली आर्थिक झळ यावर्षी भरून निघेल, अशी अपेक्षा होती; परंतु शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे उद्योजकांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी असली तरीही केवळ १० ते १५ टक्के उत्पन्न या काळात मिळत असल्याने उद्योजक मंडळी चांगलीच अडचणीत आली आहे.

कृषीवर आधारित उद्योगांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती लक्षात घेता शासनाने कर्जाचे हप्ते माफ करणे अपेक्षित आहे. उद्योग व्यवसायांना सावरण्यासाठी शासनाकडूनच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओमप्रकाश डागा, परभणी

कोरोना संसर्गकाळात शासनाने उद्योग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उद्योग सुरू ठेवला; परंतु कच्चा माल आणि इतर अडचणी आहेत. शिवाय, बाजारपेठ बंद असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे.

बाहेती, सेलू

कोरोना संसर्गामुळे वाहतूक ठप्प असल्याने व्यवसाय बंद पडला आहे. मनुष्यबळ उपलब्ध असले तरी कामगारांचे पगारही निघत नाहीत. दोन महिन्यांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आनंद भगत, परभणी