शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 10:48 IST

गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत.

मानवत ( परभणी ) : गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणा-या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. 

ग्रामपंचायतींना गाव पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून गाव विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद आहे. या निधीतून गावात विकासकामे करण्यात येतात. ग्रामविकास विभागाने आगामी तीन वर्षासाठी वार्षिक प्रस्ताव सादर केला आहेत. त्यानुसार चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. याच गुणांच्या आधारे मंजूर निधी लोकसंख्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात किमान ५० ते १०० टक्के वितरित केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित सादरीकरणानुसार निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी त्यांच्या लेखी नोंदी ठेऊन त्यांचे आॅडीट करणे देखील आवश्यक आहे. लेखा परीक्षणातील नोंदीवरून ग्रामपंचायतीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा पूर्ण करून तो योजनेच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

वित्त आयोगांतर्गत अगोदरच्या वर्षी सादर प्रस्तावात केलेल्या खर्चाचा तपशीलही क्षेत्र निहाय केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या संकेतस्तळावर दाखवावा लागणार आहे. त्यावरून गुण दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पादनात वाढ केल्यास १० गुण, २५ ते ५० टक्के वाढ केल्यास १५ गुण, ५० टक्केपेक्षा जास्त वाढ केल्यास २० गुण दिले जाणार आहेत. प्रमाणित लेख्यावरून मागील वर्षाच्या १४ व्या वित्त आयोगांतर्गत पात्र बेसिक निधीच्या प्रमाणात उत्पादनाची टक्केवारी १० टक्केपर्यंत असल्यास २० गुण, १० ते २० टक्के असल्यास २० गुण, २० ते ३० टक्के असल्यास ३० गुण व ३० टक्के पेक्षा जास्त असल्यास ४० गुण देण्यात येणार आहेत.

मागील वर्षा ग्रामपंचायत पांदणमुक्त असेल तर ३० गुण, लसीकरण झाल्यास १० गुण या चार मुद्यांच्या आधारे त्या-त्या ग्रामपंचायतींना गुण दिले जाणार आहेत. १०० पैकी ४९ टक्केपर्यंत गुण प्राप्त झाल्यास लोकसंख्या व क्षेफळाच्या आधारे मंजूर निधीच्या ५० टक्के निधी, ५० ते ६० टक्के गुण मिळाल्यास ७० टक्के निधी, ६१  ते ७० गुण मिळाल्यास ८० टक्के निधी तर ७१ पेक्षा जास्त गुण मिळाल्यास १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यामुळे आता गाव करभाºयाला ग्रामपंचायतींच्या कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक होणार आहे.

गाव पुढा-यांची वाढणार डोकेदुखीग्रामविकास विभागाचे उपसचिव एन.बी. रिंगणे यांनी ३ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षातील निधीच्या वितरणाबाबतच्या निकषातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या अधीन राहून ग्रामपंचायतींना परफॉरमन्स निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना या अगोदर मोठ्या प्रमाणात १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट मिळत असल्याने ग्रा.पं. स्तरावरील राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. मात्र आता हा निधी मिळविण्यासाठी निकषाची अट घातल्याने गाव पुढा-यांची डोकेदुखी वाढली आहे. पुन्हा बघू असे रेटून बोलणाºया सरपंचांना ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासह काम दाखवावे लागणार आहे. 

सुधारणा करण्यास मदतग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने गुणाचे निकष लावून दिले आहेत. निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायती धडपड करतात. परिणामी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यास व सुधारणा करण्यास मदत होणार आहे.- शैलेंद्र पानपाटील, विस्तार अधिकारी पं.स., मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी