शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 10:48 IST

गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत.

मानवत ( परभणी ) : गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणा-या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. 

ग्रामपंचायतींना गाव पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून गाव विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद आहे. या निधीतून गावात विकासकामे करण्यात येतात. ग्रामविकास विभागाने आगामी तीन वर्षासाठी वार्षिक प्रस्ताव सादर केला आहेत. त्यानुसार चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. याच गुणांच्या आधारे मंजूर निधी लोकसंख्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात किमान ५० ते १०० टक्के वितरित केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित सादरीकरणानुसार निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी त्यांच्या लेखी नोंदी ठेऊन त्यांचे आॅडीट करणे देखील आवश्यक आहे. लेखा परीक्षणातील नोंदीवरून ग्रामपंचायतीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा पूर्ण करून तो योजनेच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

वित्त आयोगांतर्गत अगोदरच्या वर्षी सादर प्रस्तावात केलेल्या खर्चाचा तपशीलही क्षेत्र निहाय केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या संकेतस्तळावर दाखवावा लागणार आहे. त्यावरून गुण दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पादनात वाढ केल्यास १० गुण, २५ ते ५० टक्के वाढ केल्यास १५ गुण, ५० टक्केपेक्षा जास्त वाढ केल्यास २० गुण दिले जाणार आहेत. प्रमाणित लेख्यावरून मागील वर्षाच्या १४ व्या वित्त आयोगांतर्गत पात्र बेसिक निधीच्या प्रमाणात उत्पादनाची टक्केवारी १० टक्केपर्यंत असल्यास २० गुण, १० ते २० टक्के असल्यास २० गुण, २० ते ३० टक्के असल्यास ३० गुण व ३० टक्के पेक्षा जास्त असल्यास ४० गुण देण्यात येणार आहेत.

मागील वर्षा ग्रामपंचायत पांदणमुक्त असेल तर ३० गुण, लसीकरण झाल्यास १० गुण या चार मुद्यांच्या आधारे त्या-त्या ग्रामपंचायतींना गुण दिले जाणार आहेत. १०० पैकी ४९ टक्केपर्यंत गुण प्राप्त झाल्यास लोकसंख्या व क्षेफळाच्या आधारे मंजूर निधीच्या ५० टक्के निधी, ५० ते ६० टक्के गुण मिळाल्यास ७० टक्के निधी, ६१  ते ७० गुण मिळाल्यास ८० टक्के निधी तर ७१ पेक्षा जास्त गुण मिळाल्यास १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यामुळे आता गाव करभाºयाला ग्रामपंचायतींच्या कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक होणार आहे.

गाव पुढा-यांची वाढणार डोकेदुखीग्रामविकास विभागाचे उपसचिव एन.बी. रिंगणे यांनी ३ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षातील निधीच्या वितरणाबाबतच्या निकषातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या अधीन राहून ग्रामपंचायतींना परफॉरमन्स निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना या अगोदर मोठ्या प्रमाणात १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट मिळत असल्याने ग्रा.पं. स्तरावरील राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. मात्र आता हा निधी मिळविण्यासाठी निकषाची अट घातल्याने गाव पुढा-यांची डोकेदुखी वाढली आहे. पुन्हा बघू असे रेटून बोलणाºया सरपंचांना ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासह काम दाखवावे लागणार आहे. 

सुधारणा करण्यास मदतग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने गुणाचे निकष लावून दिले आहेत. निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायती धडपड करतात. परिणामी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यास व सुधारणा करण्यास मदत होणार आहे.- शैलेंद्र पानपाटील, विस्तार अधिकारी पं.स., मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी