शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

२ लाख ४२ हजार हेक्‍टरवर होणार सोयाबीनची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:17 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्त्वाचा असतो. या हंगामातील उत्पादनावर शेतकरी एका वर्षाचे आर्थिक नियोजन करतो. त्यानुसार कृषी विभागाकडून ...

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा महत्त्वाचा असतो. या हंगामातील उत्पादनावर शेतकरी एका वर्षाचे आर्थिक नियोजन करतो. त्यानुसार कृषी विभागाकडून २०२१-२०२२ या खरीप हंगामासाठी पीक निहाय पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी लागणारे बियाणे, खत आदीबाबत पावले उचलली जात आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने २०२१-२०२२ च्या खरीप हंगामासाठी ५ लाख २२ हजार १०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार २ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, त्यापाठोपाठ १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, ८ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, २४ हजार हेक्टर क्षेत्रावर मूग, ४६ हजार २५० हेक्‍टरवर तूर तर ४ हजार २५० हेक्‍टरवर खरीप ज्वारीसाठी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. त्याचबरोबर जिल्हा कृषी विभागाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या पिकांना लागणारा रासायनिक खताचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. १ लाख ५४ हजार २०० मेट्रिक टन खताची मागणी या कार्यालयाने लातूर येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे नोंदविली आहे. त्यानुसार १ लाख ७० हजार ८८० मेट्रिक टन खताचे आवंटन मंजुरीही झाले आहे. आतापर्यंत २४ हजार २६० मेट्रिक टन खताचा पुरवठा ही जिल्ह्याला झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून आगामी खरीप हंगामाचे नियोजन करून तयारीही पूर्ण करण्यात आली आहे

दहा भरारी पथकाची स्थापना

बोगस बियाणे व इतर बाबतीत शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या गतवर्षीच्या तक्रारी लक्षात घेऊन यावर्षी जिल्ह्यात १० भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच परभणी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कृषी निविष्ठाचे केंद्र शासनाच्या परवानगीने कृषी दुकाने सुरू आहेत. यामध्ये ७६७ बियाणे, ८४४ रासायनिक खते व ८४४ कीटकनाशके औषधे विक्रीचे दुकाने जिल्ह्यात आहेत.

एक जून पर्यंत कापसाचे बियाणे विक्रीस बंदी

जिल्ह्यात मागील काही हंगामात शेंदरी बोंड आळीच्या प्रादुर्भावाचा अनुषंगाने यावर्षी पुणे येथील कृषी आयुक्तालय संचालक यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १ जून पर्यंत कापसाचे बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे १ जून पासूनच कापसाची विक्री परवानाधारक निविष्ठा दुकानातून होणार आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःकडील असलेले सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरावे. त्याचबरोबर बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उन्हाळी कापसाची लागवड न करता १ जून नंतरच कापसाची लागवड करावी.

-संतोष आळसे, जिल्हा कृषी अधीक्षक परभणी.