शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही बाजारपेठांत शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे ...

परभणी : जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा रविवारी दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधी रुपयांचा व्यवहार ठप्प झाला. एकीकडे बाजारपेठा बंद असताना दुसरीकडे रस्त्यावर मात्र वाहनधारकांची वर्दळ सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नागरी भागात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. शनिवारी पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील नागरी भागातील बाजारपेठा कडकडीत बंद ठेवत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. रविवारी बहुतांश नागरी भागात बाजारपेठ बंदच असते. मात्र, मागील काही महिन्यांपासून रविवारी बाजारपेठ बंद ठेवण्याची पद्धत बंद झाली आहे. त्यामुळे रविवारीही मोठी आर्थिक उलाढाल होते. १४ मार्च रोजी मात्र संचारबंदी लागू असल्याने व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली. सराफा बाजार, किराणा बाजार, कापड लाइन, भुसार मार्केट यासह सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने बंद राहिली. त्यामुळे शहरातील गुजरी बाजार, शिवाजी चौक, कच्छी बाजार, नानलपेठ या नेहमी गजबज असलेल्या भागात शुकशुकाट निर्माण झाला होता.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. मात्र, नागरिक त्यास गांभीर्याने घेत नसल्याचे रविवारीही दिसून आले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ सुरूच होती. या वाहनधारकांना कोणीही अडविले नाही. त्यामुळे सायंकाळपर्यंत रस्त्यांवर नागरिकांचा बिनधास्त वावर सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट

जिल्ह्यात नागरी भागात संचारबंदी असताना दुपारी १ वाजेपर्यंत बहुतांश नागरिक घराबाहेर पडल्याचे पाहावयास मिळाले. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ऊन वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत असल्याचे दिसत आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने, दुपारच्या सुमारास कडक ऊन पडल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रमुख रस्ते सुनसान झाल्याचे पाहायवास मिळाले.

२०० कोटींची उलाढाल ठप्प

बाजारपेठ बंद राहिल्याने शनिवार आणि रविवार या दोन दिवसांतील जिल्ह्यातील सुमारे २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. जिल्ह्यातील किराणा, कापड, सराफा बाजारपेठेत दररोज सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होेते. त्यात अनेक किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यवसायाचाही समावेश आहे. मात्र, दोन्ही दिवस नागरी भागातील बाजारपेठ बंद राहिल्याने, साधारणत: २०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.