शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संभाव्य पॅनलप्रमुख स्थलांतरित मतदारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:32 IST

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित ...

जिंतूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कामाच्या शोधामध्ये जिंतूर तालुक्यामधील ४७ तांडे व ३० वाडीवस्त्यांवरील जवळपास २९ हजार मतदार स्थलांतरित झाले आहेत. तालुक्यातील १०१ ग्रामपंचायत निवडणुकीत स्थलांतरित मतदारांच्या शोधात पॅनलप्रमुख लागले आहेत.

जिंतूर तालुक्यात १७० गावे असून, ४७ तांडे व जवळपास ३० वाडी-वस्त्या आहेत. रोजगाराचे प्रमुख साधन शेती हेच असल्याने मोठ्या प्रमाणावर या भागातील मजूर कामाच्या शोधासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नगर, नागपूर, सुरत या भागांमध्ये जातात. तालुक्यातील जवळपास २९ हजार मजूर कामासाठी बाहेरगावी होते; परंतु ८ महिन्यांत कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन झाले. त्यामुळे हे मजूर गावी परतले होते; परंतु लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे मजूर परत ऊसतोड व कामाच्या शोधात महानगरात परतले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूक लागल्याने त्यांना मतदान करण्यासाठी मूळ गावी यावे लागणार आहे. जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार या सर्कलमध्ये जवळपास १३ तांडे असून, आडगाव तांडा, सरोज तांडा, भुसकवडी तांडा, मोहखेड तांडा आदी तांड्यांचा यात समावेश आहे. या तांड्यांवरील जवळपास ६ ते ७ हजार मजूर कामाच्या शोधासाठी बाहेरगावी गेले आहेत. चारठाणा सर्कलमध्ये १२ तांडे असून, यामध्ये गारखेडा तांडा, राजेगाव तांडा, जांब तांडा, सायखेडा यासह १२ ते १३ तांडे आहेत. या सर्कलमधून साधारणत: साडेतीन हजार ते ४ हजार मजूर महानगरात कामासाठी गेले आहेत. वझर सर्कलमध्ये १२ तांड्यांचा समावेश असून, या तांड्यांतून जवळपास ३ हजारांपेक्षा जास्त मजूर बाहेरगावी आहेत. भोगाव सर्कलमध्ये घेवडा तांडा, पोखर्णी तांडा, खरदखी तांडा आदी ७ तांड्यांतून १ हजार मजूर बाहेरगावी गेले आहेत. सावंगी म्हाळसा सर्कलअंतर्गत ७ तांडे असून, या तांड्यांतील दीड ते दोन हजार कामगार बाहेरगावी आहेत. बोरी सर्कलमधून साधारणत: ३ हजार मजूर बाहेर असून हीच परस्थिती वस्सा, कौसडी, वरूड सर्कलची आहे. तालुक्यात जवळपास ३० वाडी- वस्त्या असून, यामधून ४ ते ५ हजार कामगार कामाच्या शोधात बाहेरगावी आहेत. त्यामुळे २९ हजार मजुरांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदारांना परत आणण्यासाठी पॅनलप्रमुखांनी यंत्रणा कामाला लावली आहे.

स्थलांतरित मतदारांत अनेक संभाव्य उमेदवार

गावगाड्यात पॅनल तयार करताना उमेदवाराकडे असलेली मतांची संख्या लक्षात घेतली जाते. अनेक संभाव्य उमेदवार ऊसतोडीसाठी गेले असल्याने त्यांना तातडीने गावात परतण्यासाठी निरोप देण्यात आले आहेत. वाॅर्ड आरक्षण, मतांची संख्या व पॅनलप्रमुखावर असलेली निष्ठा यावरच ही निवडणूक अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.