शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सात हमीभाव केंद्रांवर २०८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...

परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्रांवर हमीभाव दराने हरभऱ्याची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांकडून २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली आहे.

खरीप हंगामातील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसल्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात कापूस उपटून त्याजागी हरभऱ्याचे पीक घेतले. जिल्ह्यात यावर्षी कृषी विभागाच्या अहवालानुसार १८४ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी करण्यात आली होती. सध्या हरभऱ्याची काढणी पूर्ण झाल्यानंतर हा हरभरा शेतकरी विक्रीसाठी खासगी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात नेत होता. या संधीचा फायदा घेत खासगी व्यापाऱ्यांनी कवडीमोल दराने हरभऱ्याची खरेदी केली. त्यामुळे महाराष्ट्र स्टेट को-ऑप.च्यावतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, बोरी, पाथरी, पूर्णा व सोनपेठ या सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रांवर ५ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव दराने हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ५ हजार ६५० शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. यातील १ हजार ११२ शेतकऱ्यांना जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून हरभरा विक्रीला आणण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २०८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत २ हजार ८४ क्विंटल हरभऱ्याची विक्री या हमीभाव खरेदी केंद्रांकडे केली आहे.

यामध्ये परभणी येथील केंद्रावर ७७ शेतकऱ्यांनी ८८२ क्विंटल ५० किलो, बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २७ शेतकऱ्यांनी २५७ क्विंटल, पाथरी येथे ८५ शेतकऱ्यांनी ७४९ क्विंटल, पूर्णा येथील हमीभाव केंद्रावर १९ शेतकऱ्यांनी १९५ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची ५ हजार १०० रुपये दराने विक्री केली आहे.

तीन केंद्रांवर खरेदीच नाही

जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले असले तरी या केंद्रांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. जिंतूर, सेलू व सोनपेठ या हमीभाव खरेदी केंद्रांनी शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी आणण्यासाठी मोबाईलवर एसएमएस पाठवले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत एकाही शेतकऱ्याने आपला हरभरा विक्रीसाठी आणला नाही. खासगी बाजारपेठेत हरभऱ्याचे वाढलेले दर यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.