शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:34 IST

शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची असून, संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची या योजनेची क्षमता नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यात परभणीकरांना किमान १० दिवसांनाच पाणी मिळते. सद्यस्थितीत पाण्याच्या आवर्तनाचा कालावधी १२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. त्यातही अनेक प्रभागात जलवाहिनी पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना हातपंप किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रहाटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा फायदा उचलत मागील काही दिवसांपासून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एका आॅटोरिक्षात १ हजार आणि २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवून हे विक्रेते शहरात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. अशा विक्रेत्यांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. शहराबाहेर असणाऱ्या खाजगी विहीर किंवा बोअरवरुन पाणी आणून ते शहरवासियांना दिले जात आहे. एक हजार लिटर पाणी २५० रुपयांना आणि २ हजार लिटर ५०० रुपयांना विक्री केले जाते. एक विक्रेता दिवसभरात किमान पाच फेºया करतो. सुमारे १२५० रुपयांचा त्याचा दिवसाचा व्यवसाय होतो. सरासरी १०० विक्रेत्यांची पाण्यातून पाण्यातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल होत आहे.मनपाच्या नळयोजनेतून मिळणारे पाणी १२ दिवसांपर्यंत साठवणे शक्य नसल्याने अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. शिवाय जलवाहिनी नसलेल्या भागात हातपंपांची पाणी पातळी खालावल्याने या भागातूनही विकतच्या पाण्याला मागणी वाढत आहे. मागील आठवड्यात रहाटी येथील विद्युत पंपाचे स्टार्टर खराब झाल्याने काही भागात १४ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे शहरात पाण्याची टंचाई वाढली असून, पाण्यातून आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन टंचाईग्रस्त भागास टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेचे चार टँकर सुरू४शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ४ टँकरच्या साह्याने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. ज्या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे, त्या भागास टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या जलवाहिनी नसलेल्या भागात चार टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. शहरवासियांना नियमित पाणी मिळत नसल्याने जलवाहिनी असलेल्या भागातही टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केवळ जलवाहिनी असलेल्या भागातील परिस्थिती पाहून टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई