शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:34 IST

शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची असून, संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची या योजनेची क्षमता नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यात परभणीकरांना किमान १० दिवसांनाच पाणी मिळते. सद्यस्थितीत पाण्याच्या आवर्तनाचा कालावधी १२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. त्यातही अनेक प्रभागात जलवाहिनी पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना हातपंप किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रहाटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा फायदा उचलत मागील काही दिवसांपासून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एका आॅटोरिक्षात १ हजार आणि २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवून हे विक्रेते शहरात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. अशा विक्रेत्यांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. शहराबाहेर असणाऱ्या खाजगी विहीर किंवा बोअरवरुन पाणी आणून ते शहरवासियांना दिले जात आहे. एक हजार लिटर पाणी २५० रुपयांना आणि २ हजार लिटर ५०० रुपयांना विक्री केले जाते. एक विक्रेता दिवसभरात किमान पाच फेºया करतो. सुमारे १२५० रुपयांचा त्याचा दिवसाचा व्यवसाय होतो. सरासरी १०० विक्रेत्यांची पाण्यातून पाण्यातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल होत आहे.मनपाच्या नळयोजनेतून मिळणारे पाणी १२ दिवसांपर्यंत साठवणे शक्य नसल्याने अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. शिवाय जलवाहिनी नसलेल्या भागात हातपंपांची पाणी पातळी खालावल्याने या भागातूनही विकतच्या पाण्याला मागणी वाढत आहे. मागील आठवड्यात रहाटी येथील विद्युत पंपाचे स्टार्टर खराब झाल्याने काही भागात १४ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे शहरात पाण्याची टंचाई वाढली असून, पाण्यातून आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन टंचाईग्रस्त भागास टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेचे चार टँकर सुरू४शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ४ टँकरच्या साह्याने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. ज्या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे, त्या भागास टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या जलवाहिनी नसलेल्या भागात चार टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. शहरवासियांना नियमित पाणी मिळत नसल्याने जलवाहिनी असलेल्या भागातही टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केवळ जलवाहिनी असलेल्या भागातील परिस्थिती पाहून टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई