शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
3
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
4
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
5
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
6
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
7
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
8
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
9
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
10
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
11
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
12
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
13
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
14
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
15
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
16
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
17
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
18
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
19
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
20
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...

परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:34 IST

शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची असून, संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची या योजनेची क्षमता नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यात परभणीकरांना किमान १० दिवसांनाच पाणी मिळते. सद्यस्थितीत पाण्याच्या आवर्तनाचा कालावधी १२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. त्यातही अनेक प्रभागात जलवाहिनी पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना हातपंप किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रहाटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा फायदा उचलत मागील काही दिवसांपासून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एका आॅटोरिक्षात १ हजार आणि २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवून हे विक्रेते शहरात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. अशा विक्रेत्यांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. शहराबाहेर असणाऱ्या खाजगी विहीर किंवा बोअरवरुन पाणी आणून ते शहरवासियांना दिले जात आहे. एक हजार लिटर पाणी २५० रुपयांना आणि २ हजार लिटर ५०० रुपयांना विक्री केले जाते. एक विक्रेता दिवसभरात किमान पाच फेºया करतो. सुमारे १२५० रुपयांचा त्याचा दिवसाचा व्यवसाय होतो. सरासरी १०० विक्रेत्यांची पाण्यातून पाण्यातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल होत आहे.मनपाच्या नळयोजनेतून मिळणारे पाणी १२ दिवसांपर्यंत साठवणे शक्य नसल्याने अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. शिवाय जलवाहिनी नसलेल्या भागात हातपंपांची पाणी पातळी खालावल्याने या भागातूनही विकतच्या पाण्याला मागणी वाढत आहे. मागील आठवड्यात रहाटी येथील विद्युत पंपाचे स्टार्टर खराब झाल्याने काही भागात १४ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे शहरात पाण्याची टंचाई वाढली असून, पाण्यातून आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन टंचाईग्रस्त भागास टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेचे चार टँकर सुरू४शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ४ टँकरच्या साह्याने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. ज्या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे, त्या भागास टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या जलवाहिनी नसलेल्या भागात चार टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. शहरवासियांना नियमित पाणी मिळत नसल्याने जलवाहिनी असलेल्या भागातही टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केवळ जलवाहिनी असलेल्या भागातील परिस्थिती पाहून टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई