शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:25 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.राहाटी बंधाºयातून परभणीकरांना पाणीपुरवठा केला जातो. या बंधाºयामध्ये दरवर्षी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिद्धेश्वर बंधाºयातून चार आणि निम्न दुधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये परभणीकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यावर्षी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही जपून पाणी वापरावे लागणार आहे.परभणी शहरासाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या आरक्षण कोट्यातून ३ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली होती. राहाटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १.५ दलघमी असून, एका पाणी पाळीतून मिळालेले पाणी साधारणत: दीड महिना शहरवासियांना पुरणार आहे. सध्या बंधाºयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आणखी २० दिवस पुरेल एवढा साठा बंधाºयात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच मनपाला पुढील पाणी पाळीचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी सुमारे ८ दलघमी पाणी प्रकल्पातून सोडावे लागते, तेव्हा कुठे बंधाºयात दीड दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हानही मनपासमोर उभे टाकले आहे.दहा दिवसांतून एक वेळा पाणीपरभणी शहरात सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरविताना मनपाला कसरत करावी लागते. पाणीटंचाई नसतानाही शहराला ८ ते ९ दिवसांतून एक वेळा पाणी येत होेते. आता १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एक वेळा पाणी सोडल्यानंतर तीन ते चार तास नळांना पाणी राहते. तीन ते चार तास पाणी सोडले तरच ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते. दरम्यान, शहरात पाण्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक भागामध्ये नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरणे झाल्यानंतर नळावाटे पाण्याचा अपव्यय होतो. सर्व नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टळू शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेला आता कडक धोरण राबवावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प