शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

परभणी : संघर्ष समितीचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:28 AM

लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. यामुळे तालुक्यात पाणीपातळी खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुधना प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना तालुक्यासाठी पाणी आवर्तन सोडले जात नाही. यामुळे तालुक्यातील गोगलगाव, सावंगी मगर, इरळद, मंगरुळ, नरळद, टाकळी नीलवर्ण, कोथाळा, राजुरा, शेवडी जहांगीर व पार्डी या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दुधना काठावरील या ११ गावातील ग्रामस्थांनी बैलगाडीसह मानवतरोड येथे रास्तारोको केला. ११.३० ते १२.१५ या वेळेत हे आंदोलन सुरु होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, लिंबाजी कचरे, अशोक बुरखुंडे, बाळासाहेब आळणे, दीपक लिपने यांची भाषणे झाली. संघर्ष समितीचे बाळासाहेब आळणे, लिंबाजी कचरे, भगवान मुळे, संजय देशमुख, अण्णासाहेब मगर, दत्तराव मगर, सुभाष देशमुख, रामराजे महाडिक, रमेश कदम, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशोर कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकुल वांघुडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर, शिवशंकर मन्नाळे, नागनाथ कुकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आंदोलकांवर गुन्हे दाखलदुधना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग अडविणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे ही कारणे देऊन पोलिसांनी २२ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशन कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामराजे महाडिक, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते, शिवशंकर पाते, अण्णासाहेब मगर या आंदोलकांचा समावेश आहे. आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन