शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कालवा दुरुस्तीला धोरणांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 23:59 IST

जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने थेट निधी बंद केला असून वसुलीच्या रक्कमेतून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने थेट निधी बंद केला असून वसुलीच्या रक्कमेतून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या तालुक्यांमध्ये जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा प्रवाही आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड येथून या कालव्याला सुरुवात झाली असून मुख्य कालवा, वितरिका, उपवितरिकांच्या माध्यमातून डाव्या कालव्यावर साधारणत: ९० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचप्रमाणे या प्रकल्पाचा उजवा कालवाही सोनपेठ, गंगाखेड या भागातून जात असल्याने उजव्या कालव्याच्या माध्यमातूनही सिंचन होते.खरीप हंगामामध्ये मान्सूनच्या पावसावर पिके घेतली जातात. तर रबी हंगामात डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्यावर या भागातील शेती सिंचनाखाली आली आहे. कालव्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे आहे. दरवर्षी दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध होत असे. त्यामुळे दुरुस्तीची कामेही वेळेत पूर्ण केली जात होती; परंतु, मागील काही वर्षापासून दुरुस्तीसाठी येणारा निधी बंद करण्यात आला आहे. पाणीपट्टी वसुलीतून जमा होणाºया रक्कमेतूनच दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला जातो. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळणेही दुरापास्त झाले आहे. कालव्यांची नियमित दुरुस्ती होत नसल्याने सिंचनासाठी सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. परिणामी पाणी सोडूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्याची स्थिती आहे. तेव्हा कालवा दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पूर्वीप्रमाणेच निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आता होत आहे.तीन वेळा दिले जाते पाणी४जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी खरीप, रबी आणि उन्हाळी अशा तीन सत्रांमध्ये पाणी पाळी दिली जाते. कालव्याला पाणी सोडण्यापूर्वी लाभक्षेत्रातील शेतकºयांकडून पाणी मागणी अर्ज मागविले जातात.४पीकनिहाय आणि हेक्टरनिहाय त्यावर पाणीपट्टी आकारारुन त्याची वसुली केली जाते. मात्र या वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी दुरुस्तीची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.नगरपालिकांकडे थकली रक्कम४जायकवाडी प्रकल्पातून नगरपालिकांना पिण्यासाठीही पाणी दिले जाते. त्यामध्ये पाथरी, मानवत आणि गंगाखेड नगरपालिकांना पाटबंधारे विभागामार्फत पिण्यासाठी पाणी पुरविण्यात आले. मात्र या पालिकांकडेही पाण्याची रक्कम थकित आहे. उपलब्ध माहितीनुसार गंगाखेड नगरपालिकेकडे ६० ते ७० लाख रुपये.४ पाथरी नगरपालिकेकडे जवळपास ८० लाख रुपये आणि मानवत नगरपालिकेकडे साधारणत: ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. पालिकांकडून चालू पाणीपट्टी भरली जात असली तरी जुनी थकबाकी दिली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे.परळीच्या थर्मलचा आधार४पिण्याच्या पाण्याबरोबरच जायकवाडी प्रकल्पाचे पाणी व्यावसायिक तत्वावरही दिले जाते. परभणी येथील पाटबंधारे विभागातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी कालव्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे औष्णिक विद्युत केंद्राकडून साधारणत: २४ कोटी रुपयांची वसुली कार्यालयास प्राप्त होते. या वसुलीच्या आधारावरच कार्यालयीन कर्मचाºयांचे पगार, कार्यालयीन खर्च आणि दुरुस्तीच्या कामाची भिस्त अवलंबून आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारfundsनिधीWaterपाणी