शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

परभणी : मनपाच्या नियोजनाअभावी परभणीत कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:04 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयात मूबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही शहरवासियांना मात्र २० दिवसांतून एकवेळा पाणी मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.परभणी शहराला राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जातो. शहरासह परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघावा यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांनी दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार नदीपात्रात सोडलेले पाणी राहटी बंधाºयात दाखल झाले आहे. त्यामुळे शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न निकाली निघणे गरजेचे होते. मात्र महानगरपालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे शहरवासियांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नागरिकांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. मागील सहा महिन्यांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात तर २० ते २२ दिवसांतून एकवेळा नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शहरातील जलवाहिनी जागोजागी फुटली आहे. त्यामुळे नळाला पाणी सोडल्यानंतरही मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. दुष्काळी परिस्थितीत एकीकडे पाणी उपलब्ध होत नसताना परभणी शहरातील रस्त्यांवर मात्र अनेक ठिकाणी पाण्याचे डोह साचल्याचे पहावयास मिळते. महापालिकेने जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्याचे काम हाती घेणे आवश्यक होते; परंतु, गळतीही दुरुस्त केली नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय सुरुच आहे. शहरात निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई दूर करण्यासल्लाी महापालिकेने पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे, अशी वारंवार मागणी करुनही मनपाचे प्रशासन मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. शासनाने टंचाई काळात पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना दिल्या असतानाही परभणी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केली जात नसल्याने शहरवासियांना कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी