शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

परभणी : सेलू तालुक्यातील बारा गावांतील नळ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:52 AM

तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

मोहन बोराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यातील विविध गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठला आहे. तसेच योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील बारा गावच्या नळ योजना बंद असल्याने आगामी काळात या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत.सेलू तालुक्यात ८२ ग्रामपंचायती असून या अंतर्गत वाड्यांची संख्या १९ आहे. ७८ गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली आहेत. यातील अनेक गावांमध्ये कोट्यावधी रुपये खर्चून कायमस्वरुपी पाणीपुरवठा व्हावा, या हेतूने योजनांची कामे करण्यात आली. मात्र किरकोळ दुरुस्ती आणि स्त्रोत कोरडे पडल्याने कोट्यावधी रुपये खर्चूनही गावांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.पाणीपुरवठा योजना जुनाट होऊन स्त्रोत कोरडे पडल्याने आहेरबोरगाव आणि डासाळा येथील नळ योजना बंद आहेत. तर किरकोळ दुरुस्तीअभावी डिग्रस खु. येथील पाणीपुरवठा बंद आहे. डिग्रसवाडी येथील पाणीपुरवठा योजना दुरुस्तीअभावी ठप्प असल्याची माहिती आहे. दुधना काठावर असलेल्या कवडधन येथील पाणीपुरवठा योजना स्त्रोत मोडकळीस आल्याने बंद आहे. कुपटा आणि म्हाळसापूर येथील योजना कालबाह्य झाल्या आहेत. तर मालेटाकळी येथील नळ योजना स्त्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा योजना ठप्प आहे. निपानी टाकळी येथील योजनाही कालबाह्यझाली असून पाण्याचे स्त्रोत कोरडे पडल्याने ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिंदे टाकळी व तांदूळवाडी येथील योजना जुनाट झाल्याने पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. आॅक्टोबर महिन्यातच पाणी पातळीत घट होत असल्याने पाण्याचे स्त्रोत झपाट्याने आटत आहेत. ग्रामीण भागातील हातपंप पाण्याअभावी कोरडे पडल्याने पाणी आणण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, कसुरा व करपरा नदी काठावरील गावांमध्ये आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आठगाव योजना : बिलाअभावी बंद४आठगाव पाणीपुरवठा योजननेचे वीज बिल थकल्याने महावितरण कंपनीने चार महिन्यांपूर्वीच वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे ही योजना बंद पडली आहे. पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र येथील लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. या योजनेला निम्न दुधना प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. टंचाईच्या काळात या योजनेतून कुंडी, म्हाळसापूर, तिडी पिंपळगाव, गुगळी धामणगाव, आहेरबोरगाव, देऊळगाव गात, डासाळा, रवळगाव या गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वीज बिल थकल्याने या योजनेतून काही दिवसच गावांना पाणी मिळते. प्राप्त माहितीनुसार टंचाईच्या काळात या योजनेच्या थकीत वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेतून पाणी मिळणार आहे. तोपर्यंत मात्र ग्रामस्थांचे हाल होत आहेत.कसुरा, करपरा नदीकाठ तहानणारकसुरा व करपरा नदीवर मोठा बंधारा नसल्याने पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या नदीकाठावरील गावांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई निर्माण होते. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने कसुरा व करपरा नदीकाठावरील अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे. जनावरांच्या चाºयाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट बनणार ंआहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई